शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

Hathras Stampede : हाथरसचं सत्संग मैदान बनलं 'स्मशानभूमी'; चेंगराचेंगरीतील ११६ जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 08:09 IST

Hathras Stampede : भोले बाबांच्या सत्संगात चेंगराचेंगरी झाली, या दुर्घटनेत आतापर्यंत ११६ जणांचा मृत्यू झाला आहे. दुपारी दीडच्या सुमारास चेंगराचेंगरी झाली.

हाथरस येथील पुलराई गावात धक्कादायक घटना घडली आहे. भोले बाबांच्या सत्संगात चेंगराचेंगरी झाली, या दुर्घटनेत आतापर्यंत ११६ जणांचा मृत्यू झाला आहे. दुपारी दीडच्या सुमारास चेंगराचेंगरी झाली. यूपी पोलिसांनी 'भोले बाबां'च्या शोधात मैनपुरी जिल्ह्यातील राम कुटीर चॅरिटेबल ट्रस्टमध्ये शोधमोहीम राबवली. आयजी शलभ माथूर यांनी सांगितलं की, सत्संग आयोजकांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात येत आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री योगी यांनी हाथरस घटनेबाबत बैठक घेतली आहे. मुख्यमंत्री घटनास्थळी पाठवलेल्या तीन मंत्र्यांच्या सतत संपर्कात आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, या घटनेला जो कोणी जबाबदार असेल, त्याला सोडलं जाणार नाही, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. 

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी झालेल्या सत्संगात सुमारे एक ते दीड लाख लोक (भक्त) सहभागी झाले होते. मोठा मंडप उभारण्यात आला होता. सत्संग संपल्यानंतर अचानक लोक बाहेर आले, पण बाहेर पडण्याचा गेट खूपच अरुंद होता आणि रस्त्यात एक नाला देखील होता. आजूबाजूला चिखल होता. याच दरम्यान, चेंगराचेंगरी होऊन लोक एकामागून एक नाल्यात पडले आणि सुमारे दीड ते दोन तास तेथेच दबले गेले. 

एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, मैदानात सत्संगचा मंडप उभारण्यात आला होता. सत्संग संपल्यावर गुरुजींची गाडी निघाली. लोक त्याच्या पायाला स्पर्श करण्यासाठी धावले आणि चेंगराचेंगरी झाली. अनेक जण एकावर एक पडले. दुर्घटनेनंतर लोकांनी तातडीने मृतदेह आणि जखमींना रुग्णालयात नेलं. हाथरस येथील सिकंदरराव ट्रॉमा सेंटरच्या बाहेर हृदय पिळवटून टाकणारं दृश्य होतं. चेंगराचेंगरीत जीव गमावलेल्या आणि बेशुद्ध झालेल्यांना रुग्णवाहिकांमध्ये आणण्यात आलं. रुग्णवाहिका कमी पडल्या, तेव्हा लोक गाडय़ांमधून मृतदेह रुग्णालयात आणू लागले.

जखमींना तसेच जीव गमावलेल्यांना रुग्णालयात आणण्यासाठी स्ट्रेचरही पुरेसे नव्हते. हॉस्पिटलमध्ये सर्वत्र आरडाओरडा ऐकू आला. आधी सत्संगात इतके भाविक जमले की आयोजक आणि प्रशासनाची व्यवस्था कोलमडली, मग अपघातातील जखमींची संख्या इतकी वाढली की, त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी पुरेशी वाहनं नव्हती. चेंगराचेंगरीत मुलगा गमावलेल्या एका आईने सांगितलं की, आम्ही दर्शनासाठी आलो होतो, खूप गर्दी होती, आम्ही बिट्टूला आमच्या मांडीवर घेत होतो. चेंगराचेंगरी झाली. 

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला आणि अधिकाऱ्यांना अपघातस्थळी पोहोचून मदतकार्य करण्याचे निर्देश दिले. पंतप्रधान कार्यालयाने चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून २ लाख रुपये आणि जखमींना ५०,००० रुपयांची मदत जाहीर केली. कार्यक्रमाच्या आयोजकांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात येणार असल्याचं योगी सरकारने सांगितले.

आयजी शलभ माथूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्संगाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात येत आहे. आतापर्यंत आमच्याकडे ११६ मृत्यूची पुष्टी झाली आहे. काही जखमीही आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी मृतदेहांचे पोस्टमार्टम करण्यात येत आहे. एफआयआर नोंदवला जात आहे. ज्या आयोजकांनी कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी घेतली आहे त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात येत आहे. उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ