शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

Hathras Stampede : "बायकोचं काहीही झालं तरी सत्संगला जाणं बंद करणार नाही"; जखमी महिलेच्या पतीने स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 09:51 IST

Hathras Stampede : हाथरसमध्ये चेंगराचेंगरी झाली तेव्हा दिल्लीहून आलेल्या शिवमंगल सिंह यांच्या पत्नी जखमी झाल्या. सध्या त्या एएमयूच्या मेडिकल कॉलेजच्या आयसीयूमध्ये दाखल आहे.

हाथरस येथे झालेल्या भीषण अपघातात १२१ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. जखमींना विविध जिल्ह्यांतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जखमींना अलीगडच्या जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. या पीडितांपैकी एक शिवमंगल सिंह आहेत, जे घटनेच्या दिवशी बाबांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी पत्नीसह दिल्लीहून आले होते.

हाथरसमध्ये चेंगराचेंगरी झाली तेव्हा दिल्लीहून आलेल्या शिवमंगल सिंह यांच्या पत्नी जखमी झाल्या. सध्या त्या एएमयूच्या मेडिकल कॉलेजच्या आयसीयूमध्ये दाखल आहे. यात बाबांचा काही दोष नसल्याचं शिवमंगल सांगतात. बाबा कधीही लोकांना आपल्या मागे या असं सांगत नाहीत. तो जनतेचा दोष आहे. बायकोला काहीही झालं तरी बाबांकडे जाणं सोडणार, थांबवणार नाही असंही म्हटलं आहे. 

मीडियाशी बोलताना एटा येथील रहिवासी शिवमंगल सिंह म्हणाले की, माझी पत्नी आयसीयूमध्ये दाखल आहे, ती जखमी आहे. हाथरसमध्ये अपघात झाला त्यावेळी मी आणि माझी पत्नी तिथे होतो. आम्ही दिल्लीहून आलो होतो. त्यांच्याकडून चांगली प्रेरणा मिळत असल्याने आम्ही गेल्या दीड वर्षांपासून येत आहोत. चांगल्या मार्गावर कसं चालायचं हे दाखवलं. सर्व लोकांना एकत्र राहायला शिकवलं. ते चांगल्या गोष्टी सांगतात. 

शिवमंगलने सांगितलं की, घटनेच्या वेळी मी तिथे होतो, पण थोडा दूर होतो. नंतर कळलं की येथे चेंगराचेंगरी झाली आहे. मी फोन केल्यावर माझ्या पत्नीच्या मैत्रिणींनी फोन उचलला. मी तिला विचारल्यावर तिने ती कुठे आहे हे सांगितलं. शोधत शोधत तिथे पोहोचलो पण तिथे माझी बायको सापडली नाही म्हणून मी हॉस्पिटल गाठलं. पत्नी तिथेच होती. तेथून तिला रेफर करण्यात आलं. आता अलिगड रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल आहे.

भोले बाबांचे कमांडो किंवा सेवकही यासाठी दोषी नाहीत. बाबांच्या मागे धावायला कोणालाही सांगितलं नाही. फक्त जनताच जबाबदार आहे. यासाठी पत्नीही दोषी आहे. जिथे गर्दी होती तिथे ती का गेली? तरीही आम्ही या कार्यक्रमाला जाणार आहोत. माझी पत्नी रुग्णालयात आहे. आम्हाला पुन्हा देखील जायला आवडेल. माझ्या पत्नीचे काहीही झाले तरी आम्ही जाणं बंद करणार नाही असंही शिवमंगलने म्हटलं आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश