शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

Hathras Stampede : "सर्वांना एक दिवस मरायचं आहे..."; हाथरस दुर्घटनेवर भोले बाबांचं धक्कादायक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 08:24 IST

Hathras Stampede And Bhole Baba : हाथरस येथे सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील फुलराई गावात बाबा हरिनारायण साकार उर्फ ​​भोले बाबा यांचा सत्संग सुरू होता.

उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यात धक्कादायक घटना घडली. हाथरस येथे सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील फुलराई गावात बाबा हरिनारायण साकार उर्फ ​​भोले बाबा यांचा सत्संग सुरू होता. यानंतर चेंगराचेंगरी झाली आहे. याच दरम्यान आता भोले बाबांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे. चेंगराचेंगरीमुळे खूप व्यथित झालो आहे, पण नशिबात जे लिहिलं आहे ते कोणीही टाळू शकत नाही आणि सर्वांना एक दिवस मरायचं आहे असं म्हटलं. 

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत भोले बाबांनी सांगितलं की, २ जुलैच्या घटनेपासून ते डिप्रेशनमध्ये आहेत आणि अत्यंत व्यथित झाले आहेत, पण जे घडायचं असतं ते कोण टाळू शकतं. जो जन्माला आला आहे त्याला एक दिवस जायचंच आहे. त्यांनी त्यांचे वकील ए.पी. सिंह यांच्या आधीच्या विधानाचा पुनरुच्चार केला आणि म्हणाले, आमचे वकील डॉ. ए.पी. सिंह आणि प्रत्यक्षदर्शी यांनी ज्या विषारी स्प्रेबाबत सांगितलं ते पूर्णपणे सत्य आहे, काहीतरी कट सुरू होता.

सनातन आणि सत्याच्या आधारे चालणाऱ्या त्यांच्या संस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न काही लोक करत असल्याचा आरोप देखील भोले बाबा यांनी केला. "आमचा एसआयटी (विशेष तपास पथक) आणि न्यायिक आयोगावर पूर्ण विश्वास आहे आणि 'मानव मंगल मिलन सद्भावना समागम'च्या सर्व अनुयायांनाही पूर्ण विश्वास आहे की ते शक्य ते सर्व प्रयत्न करून कट रचणाऱ्यांचा पर्दाफाश करतील" असं भोले बाबा यांनी म्हटलं आहे. 

एसआयटीने राज्य सरकारला दिलेल्या रिपोर्टमध्ये सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीमागे कोणता तरी मोठा कट असल्याचा दावा फेटाळून लावला आहे. एसआयटीच्या रिपोर्टमध्ये स्थानिक प्रशासनाकडून चूक झाल्याचं म्हटलं आहे. तसेच या चेंगराचेंगरीला आयोजकांना जबाबदार धरलं आहे. कारण त्यांनी गर्दी नियंत्रित करण्यासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था केली नाही. त्यामुळेच सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये १२१ जणांचा मृत्यू झाला आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश