शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
5
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
7
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
8
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
9
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
10
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
11
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
12
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
13
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
14
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
15
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
16
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
17
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
18
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
19
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
20
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

Hathras Gangrape : आता भाजपाच्या माजी आमदाराने आयोजित केली पंचायत, पीडित कुटंबावरच केले आरोप

By बाळकृष्ण परब | Updated: October 4, 2020 16:59 IST

हाथरस बलात्कार प्रकरणावरून मोठ्या प्रमाणात राजकारणही खेळले जात आहे. यादरम्यान, आज हाथरसमध्ये एक पंचायतही बोलावण्यात आली होती.

ठळक मुद्देभाजपाचे माजी आमदार राजवीर सिंह पलहवान यांनी बोलावली होती ही पंचायत १४ सप्टेंबर रोजी संबंधित तरुणी आणि तिचा भाऊ पोलीस ठाण्यात तक्रार देऊन आले होते. मात्र त्यावेळी माध्यमांनी दखल घेतली नव्हतीनंतर प्रसारमाध्यमे आणि इतर राजकीय पक्षांच्या लोकांनी या कुटुंबाला भडकवले

हाथरस ( उत्तर प्रदेश) - हाथरस येथील एका तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. दरम्यान, या प्रकरणावरून मोठ्या प्रमाणात राजकारणही खेळले जात आहे. आज एकीकडे हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांचा जबाब नोंदवण्यासाठी एसआयटीचे पथक पुन्हा एकदा दाखल झाले. तर दुसरीकडे विविध पक्षांचे नेतेही या कुटुंबाची भेट घेण्यासाठी येत आहेत. यादरम्यान, आज हाथरसमध्ये एक पंचायतही बोलावण्यात आली होती.मिळालेल्या माहितीनुसार ही पंचायत भाजपाचे माजी आमदार राजवीर सिंह पलहवान यांनी बोलावली होती. या प्रकरणाच्या चौकशीसाठी योगी सरकारने जे आदेश दिले आहेत त्यामुळे प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी होईल, असा दावा या पंचायतीत करण्यात आला. ज्या दिवशी ही घटना घडली त्यानंतर बलात्कार झाल्याचे चुकीच्या पद्धतीने प्रसारित करण्यात आले, ही माहिती चुकीची आहे, असे राजवीर सिंह पलहवान यांनी सांगितले.राजवीर सिंह म्हणाले की, आम्ही राज्य सरकारला सांगितले की, दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी झाले पाहिजे. यासाठी सर्वांची नार्को चाचणी झाली पाहिजे. सीबीआय तपासाचा आदेश आला पाहिजे. आम्ही राज्य सरकारकडे ही मागणी केली होती. आम्ही राज्य सरकारकडे ही मागणी केली होती. आता या पंचातीमध्ये जमलेले लोक प्रदेश सरकारच्या निर्णयावर समाधानी आहेत, असे राजवीर सिंह यांनी सांगितले. सरकारचे आभार मानण्यासाठी ही पंचायत बोलावली आहे, असेही ते पुढे म्हणाले.१४ सप्टेंबर रोजी संबंधित तरुणी आणि तिचा भाऊ पोलीस ठाण्यात तक्रार देऊन आले होते. मात्र त्यावेळी माध्यमांनी दखल घेतली नव्हती. पण नंतर प्रसारमाध्यमे आणि इतर राजकीय पक्षांच्या लोकांनी या कुटुंबाला भडकवले. तीन दिवसांनंतर साक्ष बदलवण्यात आली. त्यानंतर दर तीन दिवसांनी साक्षी बदलत गेल्या आणि माध्यमे टीआरपीसाठी बातम्या चालवत राहिले, असे राजवीर सिंह म्हणाले. दरम्यान, राजवीर सिंह यांनी सामूहिक बलात्काराचे वृत्तही फेटाळून लावले. मागासवर्गीय समाजातील एका तरुणीला मारहाण झाल्याची खोटी माहिती पसरवून हाथरसला बदनाम करण्यात आले, असा दावाही त्यांनी केला."मुलींवर चांगले संस्कार नसल्यानेच बलात्कार", भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधानयाच दरम्यान भाजपाच्या एका नेत्याने वादग्रस्त विधान केलं आहे. मुलींवर चांगले संस्कार नसल्यानेच बलात्कार होत असल्याचं धक्कादायक विधान केलं आहे. उत्तर प्रदेशच्या बलिया विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी ही मुक्ताफळं उधळली आहेत. हाथरस प्रकरणावर प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे. सुरेंद्र सिंह आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. "आपल्या मुलींना संस्कारीत वातावरणात राहण्याच्या, चालण्याच्या आणि एक शालीन व्यवहार दर्शवण्याच्या पद्धती शिकवणं हा आई-वडिलांचा धर्म आहे. अशा घटना चांगल्या संस्कारांनीच थांबवल्या जाऊ शकतात. अशा घटनांना शासन आणि तलवारी रोखू शकत नाहीत" असं सुरेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये रामराज्याचा दावा केला जात असताना बलात्कारासारख्या घटना समोर येत आहेत. यामागचं कारण काय? असा प्रश्न सिंह यांना विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी वादग्रस्त विधान केलं आहे.

 

टॅग्स :Hathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कारBJPभाजपाPoliticsराजकारणUttar Pradeshउत्तर प्रदेश