शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

Hathras Case: सर्व आरोपी निर्दोष असून, त्यांची लगेच मुक्तता करा; भाजप नेत्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2020 07:30 IST

Hathras Case: बलात्कार झालेल्या महिलांचे मृतदेह गव्हाच्या नव्हे, तर तांदळाच्या शेतातच का आढळून येतात? कारण त्यांची मरण्याची जागा तीच असते, असे लाजिरवाणे उद्गार बाराबंकी येथील भाजपचे नेते रणजित श्रीवास्तव यांनी काढले.

बाराबंकी : उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील दलित मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी निर्दोष असून, त्यांची तात्काळ मुक्तता करा. बलात्कार झालेल्या महिलांचे मृतदेह गव्हाच्या नव्हे, तर तांदळाच्या शेतातच का आढळून येतात? कारण त्यांची मरण्याची जागा तीच असते, असे लाजिरवाणे उद्गार बाराबंकी येथील भाजपचे नेते रणजित श्रीवास्तव यांनी काढले.रणजित श्रीवास्तव यांनी म्हटले आहे की, त्या मुलीने मुलाला बाजरीच्या शेतात बोलाविले होते, कारण प्रेमाचा मामला होता. या सर्व गोष्टींचा तपशील समाजमाध्यमांवर व वृत्तवाहिन्यांच्या बातम्यांमध्येही उपलब्ध आहे. अशा प्रकारच्या मुली काही विशिष्ट जागीच मेलेल्या आढळून आल्या आहेत. या मुलींचे मृतदेह उसाच्या, मका, बाजरीच्या शेतात, नाल्यामध्ये, झाडाझुडपांत, जंगलामध्येच आढळून येतात.या सगळ्या गोष्टींचा नीट विचार झाला पाहिजे. श्रीवास्तव यांचे विचार पुराणकालीन, तसेच अत्यंत बुरसटलेले असल्याची टीका राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी केली आहे. ते कोणत्याही पक्षाचे राजकीय नेते होण्यास पात्र नाहीत, असेही शर्मा यांनी म्हटले आहे. श्रीवास्तव यांना राष्ट्रीय महिला आयोगाने नोटीस पाठविली आहे. (वृत्तसंस्था)भरपाई कशानेही होणार नाहीश्रीवास्तव म्हणाले की, हाथरस बलात्कार प्रकरणातील आरोपींची काहीही चूक नसून त्यांची त्वरित सुटका करण्यात आली पाहिजे. या आरोपींचे निर्दोषत्व सिद्ध होईपर्यंतचा काळ त्यांना तुरुंगातच राहावे लागणार आहे. या तरुणांच्या आयुष्यातील वाया जाणाऱ्या या दिवसांची भरपाई आणखी कशानेही होणार नाही. रणजित श्रीवास्तव यांनी केलेल्या वक्तव्याची व्हिडिओ फीत समाजमाध्यमावर झळकली आहे.

 

टॅग्स :Hathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कारBJPभाजपा