शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
2
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
3
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
4
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
5
फडणवीसांबद्दल अपशब्द वापरल्यास जीभ हासडून हातात देऊ; मंत्री नितेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा
6
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
7
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
8
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
9
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
10
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
11
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
12
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
13
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
14
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
15
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!
16
जगदीप धनखड नजरकैदेत? अमित शाहांच्या उत्तरावर जयराम रमेश यांची टीका; म्हणाले- 'रहस्य...'
17
'माय फ्रेंड गणेशा' मधला छोटासा मुलगा आता आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा कशी दिसते? (Photos)
18
Jio IPO ची प्रतीक्षा आता संपणार! शुक्रवारी मुकेश अंबानी देणार सरप्राईज?
19
व्हिएतनाममधील ५.८ लाख लोकांना आपली घरं सोडावी लागणार! नेमकं कारण तरी काय?
20
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!

टोळधाडीचा हल्ला परतवण्यासाठी हरयाणा सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 01:03 IST

मागील दीड महिन्यापासून टोळधाड पाकिस्तानमधून राजस्थानमध्ये हवेच्या प्रवाहाबरोबर येत आहेत

चंदीगड : टोळधाडीचा हल्ला परतवण्यासाठी हरयाणा पूर्णपणे सज्ज आहे, असे हरयाणाचे कृषिमंत्री जे.पी. दलाल यांनी रविवारी म्हटले आहे. रेवाडी जिल्ह्यात टोळधाडीचा हल्ला वेळीच परतवून लावण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांचे कौतुकही केले. दरम्यान, त्या जिल्ह्यात टोळधाडीमुळे झालेल्या पीक नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचा आदेशही त्यांनी दिला.

मागील दीड महिन्यापासून टोळधाड पाकिस्तानमधून राजस्थानमध्ये हवेच्या प्रवाहाबरोबर येत आहेत. ही टोळधाड एका राज्यातून दुसºया राज्यात जात असून, त्यांच्या मार्गात येणारी पिकेही नष्ट करीत आहेत. यापूर्वी मे महिन्यात टोळधाडीने राजस्थानमध्ये हल्ला केला होता. त्यानंतर पंजाब, गुजरात, महाराष्ट्र व मध्यप्रदेशात पिकांचे मोठे नुकसान केलेले आहे. दलाल यांनी म्हटले आहे की, टोळधाडीच्या हल्ल्यातून पिके वाचविण्यासाठी आमच्याकडे कीटकनाशक व यंत्रांचा पुरेसा साठा आहे. टोळधाड पीक, झाडे व जमिनीवर बसताच आमचे अधिकारी तात्काळ कारवाई करतात. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता रेवाडीमध्ये टोळधाडीने प्रवेश केला होता.रात्री जाटुसाना गावात त्यांचा मुक्काम होता. त्यावेळी प्रशासनाला ३५ टक्के टोळधाड हटविण्यात यश आले. आम्हाला वाटले होते की, टोळधाड रोहतक व सोनिपतकडे सरकतील; परंतु हवेच्या प्रवाहाने त्यांची दिशा बदलली. त्यामुळे टोळधाड गुरुग्राम, दिल्ली व पुन्हा उत्तर प्रदेशकडे सरकली. टोळधाडीच्या हल्ल्यामुळे नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याचा अहवाल मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येणार आहे, तसेच हानी झालेल्या शेतकºयांना योग्य मोबदला दिला जाणार आहे. दरम्यान, टोळधाडीचा हल्ला परतवून लावण्यात राज्य सरकार अपयशी ठरले, असा आरोप काँग्रेसने केला होता. तो कृषिमंत्री जे.पी. दलाल यांनी फेटाळून लावला.ढोल, भांडे वाजविण्याचे आवाहन

  • टोळधाड घालवण्यासाठी लोकांनी ढोल, भांडे वाजवावेत, तसेच मोठ्या आवाजात संगीत वाजवावे किंवा फटाके वाजवावेत.
  • टोळधाड बहुतांश करून दिवसा हल्ला करतात व रात्री आराम करतात. त्यामुळे त्यांना रात्री आराम करू दिला जाऊ नये.
टॅग्स :HaryanaहरयाणाPakistanपाकिस्तान