शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
6
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
7
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
8
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
9
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
10
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
11
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
12
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
13
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
14
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
15
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
16
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
17
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
18
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
19
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
20
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार

टोळधाडीचा हल्ला परतवण्यासाठी हरयाणा सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 01:03 IST

मागील दीड महिन्यापासून टोळधाड पाकिस्तानमधून राजस्थानमध्ये हवेच्या प्रवाहाबरोबर येत आहेत

चंदीगड : टोळधाडीचा हल्ला परतवण्यासाठी हरयाणा पूर्णपणे सज्ज आहे, असे हरयाणाचे कृषिमंत्री जे.पी. दलाल यांनी रविवारी म्हटले आहे. रेवाडी जिल्ह्यात टोळधाडीचा हल्ला वेळीच परतवून लावण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांचे कौतुकही केले. दरम्यान, त्या जिल्ह्यात टोळधाडीमुळे झालेल्या पीक नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचा आदेशही त्यांनी दिला.

मागील दीड महिन्यापासून टोळधाड पाकिस्तानमधून राजस्थानमध्ये हवेच्या प्रवाहाबरोबर येत आहेत. ही टोळधाड एका राज्यातून दुसºया राज्यात जात असून, त्यांच्या मार्गात येणारी पिकेही नष्ट करीत आहेत. यापूर्वी मे महिन्यात टोळधाडीने राजस्थानमध्ये हल्ला केला होता. त्यानंतर पंजाब, गुजरात, महाराष्ट्र व मध्यप्रदेशात पिकांचे मोठे नुकसान केलेले आहे. दलाल यांनी म्हटले आहे की, टोळधाडीच्या हल्ल्यातून पिके वाचविण्यासाठी आमच्याकडे कीटकनाशक व यंत्रांचा पुरेसा साठा आहे. टोळधाड पीक, झाडे व जमिनीवर बसताच आमचे अधिकारी तात्काळ कारवाई करतात. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता रेवाडीमध्ये टोळधाडीने प्रवेश केला होता.रात्री जाटुसाना गावात त्यांचा मुक्काम होता. त्यावेळी प्रशासनाला ३५ टक्के टोळधाड हटविण्यात यश आले. आम्हाला वाटले होते की, टोळधाड रोहतक व सोनिपतकडे सरकतील; परंतु हवेच्या प्रवाहाने त्यांची दिशा बदलली. त्यामुळे टोळधाड गुरुग्राम, दिल्ली व पुन्हा उत्तर प्रदेशकडे सरकली. टोळधाडीच्या हल्ल्यामुळे नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याचा अहवाल मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येणार आहे, तसेच हानी झालेल्या शेतकºयांना योग्य मोबदला दिला जाणार आहे. दरम्यान, टोळधाडीचा हल्ला परतवून लावण्यात राज्य सरकार अपयशी ठरले, असा आरोप काँग्रेसने केला होता. तो कृषिमंत्री जे.पी. दलाल यांनी फेटाळून लावला.ढोल, भांडे वाजविण्याचे आवाहन

  • टोळधाड घालवण्यासाठी लोकांनी ढोल, भांडे वाजवावेत, तसेच मोठ्या आवाजात संगीत वाजवावे किंवा फटाके वाजवावेत.
  • टोळधाड बहुतांश करून दिवसा हल्ला करतात व रात्री आराम करतात. त्यामुळे त्यांना रात्री आराम करू दिला जाऊ नये.
टॅग्स :HaryanaहरयाणाPakistanपाकिस्तान