शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

"मी कारगिल युद्ध लढलो, माझा मुलगा..."; नूंह हिंसाचारात मारल्या गेलेल्या जवानाच्या वडिलांचं दु:ख

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 12:29 IST

नीरजचे संपूर्ण कुटुंब संरक्षण आणि होमगार्डच्या पार्श्वभूमीतून आले आहे. नीरजचे वडील भावूक झाले.

हरियाणातील मेवात-नूंह येथे सोमवारी झालेल्या हिंसाचारात दोन होमगार्डसह 6 जणांचा मृत्यू झाला आहे. या हिंसाचारात होमगार्ड नीरज यांना आपला जीव गमवावा लागला. नीरजचं कुटुंब गढ़ी बाजीदपूर, गुरुग्राम येथे राहतं. हे हिंदूबहुल गाव आहे, जिथे 50 मुस्लिम कुटुंबही राहतात. 'आज तक'शी केलेल्या संभाषणात नीरजच्या कुटुंबीयांनी सांगितले की, त्यांच्या गावातील लोक नेहमीच शांतता आणि सौहार्दाने एकत्र राहतात. अशा हिंसाचाराचा विचारही त्यांनी केला नव्हता.

नीरजचे संपूर्ण कुटुंब संरक्षण आणि होमगार्डच्या पार्श्वभूमीतून आले आहे. नीरजचे वडील भावूक झाले. ते म्हणाले, "मी देशाची सेवा केली, मी कारगिलमध्ये लढलो, माझा मुलगा कर्तव्य बजावताना शहीद झाला याचा मला अभिमान आहे. नीरजवर काल पूर्ण आदराने अंत्यसंस्कार करण्यात आले."

नीरजचे वडील म्हणाले, "जे लोक जातीय तणाव निर्माण करतात ते चुकीचे आहेत, कोणताही धर्म असे म्हणत नाही. मी माझ्या नातवंडांनाही देशसेवेसाठी पाठवणार आहे." दुसरीकडे, नीरजच्या पत्नीने सांगितले की, "मी सरकारला आवाहन करते की, दोन समुदायांमधील हे भांडण थांबवा. माझ्यासारखी एखादी महिला विधवा होऊ नये किंवा कोणाच्याही मुलांनी वडील गमावू नये असं मला वाटत आहे. 

हिंसाचारात ठार झालेल्या चार नागरिकांमध्ये शक्तीचेही नाव आहे. शक्ती हा नूहपासून 18 किलोमीटर अंतरावर असलेल्या भादस गावचा रहिवासी होता. या गावात हिंदूंची लोकसंख्या फक्त दोन टक्के आहे. मात्र आजपर्यंत येथे कधीही हिंसाचार किंवा गोंधळ झाला नाही. शक्तीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, शक्ती हा बडकल भागातील एका मिठाईच्या दुकानात काम करायचा. गवंडी म्हणूनही काम करायचे. बडकल भागातून हिंसाचार सुरू झाला तेव्हा शक्ती घरी आला होता. 

हिंसाचारानंतर गावातील सर्व हिंदू कुटुंबे घाबरली, मग कळले की गावातील मोठ्या गुरुकुलावर (आश्रम) दंगलखोरांनी हल्ला केला आहे. माहिती मिळताच शक्ती त्या बाजूला गेले, त्यानंतर तो घरी परतलेच नाहीत. यानंतर त्याचा मृतदेह रस्त्यात सापडल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली. शक्तीच्या डोक्यात जड वस्तूने मागून हल्ला करण्यात आला. 300-400 च्या जमावाने गुरुकुलावर हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.