शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

VIDEO: कृषी विधेयकांबद्दल शेतकऱ्यांनी प्रश्न विचारताच भाजपा आमदारानं काढला पळ

By कुणाल गवाणकर | Updated: September 28, 2020 17:24 IST

शेतकऱ्यांची सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी; कृषी विधेयकांबद्दल संताप व्यक्त

चंदीगढ: नुकतंच पार पडलेलं संसदेचं पावसाळी अधिवेशन कृषी विधेयकांमुळे गाजलं. राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. विरोधी पक्षाच्या खासदारांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. माईकची मोडतोड करून उपसभापतींसमोरील नियम पुस्तिकाही फाडली. यानंतर आवाजी मतदानानं राज्यसभेत विधेयकं मंजूर झाली. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन त्यांना विधेयकांवर स्वाक्षरी न करण्याची विनंती केली होती. मात्र कालच कोविंद यांनी तिन्ही विधेयकांना मंजुरी दिली. सरकारनं मंजूर केलेल्या विधेयकांविरोधात देशभरात लाखो शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. शेतकऱ्यांच्या रोषाचा फटका भाजपच्या हरयाणातल्या एका आमदाराला बसला. या आमदाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इंद्री मतदारसंघाचे आमदार राम कुमार कश्यप यांना शेतकऱ्यांनी घेरलं. त्यांना कृषी विधेयकांबद्दल प्रश्न विचारले. मात्र कश्यप यांना एकाही प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या गराड्यातून कश्यप यांनी पळ काढला.सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @ramanmann1974 ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. यामध्ये आमदार राम कुमार कश्यप शेतकऱ्यांसोबत बोलताना दिसत आहेत. 'शेतकरी आमची मतपेढी आहे. आमची मतं गमावू असं कोणतंही विधेयक आम्ही आणू का?,' असा प्रश्न कश्यप यांनी शेतकऱ्यांना विचारला. यानंतर उपस्थितांनी भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ते पाहून आमदारांनी तिथून पळ काढला.मोदी सरकारनं मंजूर करून घेतलेल्या कृषी विधेयकांविरोधात देशभरात निदर्शनं सुरू आहेत. लाखो शेतकरी रस्त्यावर उतरून आपला निषेध व्यक्त करत आहेत. पंजाब, हरयाणामध्ये आंदोलनाचा जोर अधिक आहे. आज सकाळी राजपथावर आंदोलनादरम्यान एका ट्रॅक्टरला आग लावण्यात आली. कर्नाटकमधल्या शेतकरी संघटनांनी आज बंद पाळला आहे. तर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी ठिय्या मांडला आहे.

टॅग्स :BJPभाजपाFarmerशेतकरी