शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
3
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
4
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
5
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
6
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
7
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
8
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
9
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
10
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
11
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
12
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
13
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
14
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
15
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
16
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
18
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
19
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
20
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!

हरियाणामध्ये डोंगर खचला! भूस्खलनात १० वाहनं आणि २० जण दबले गेल्याची भीती; एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2022 13:46 IST

हरियाणातील भिवानी जिल्ह्यात नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठी घटना घडली आहे.

Haryana : हरियाणातील भिवानी जिल्ह्यात नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठी घटना घडली आहे. भिवानी जिल्ह्यात डोंगर खचल्यामुळे (Moumtain Cracking) ८ ते १० वाहना त्याखाली दबली गेली आहे. यात जवळपास १५ ते २० लोक असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर आतापर्यंत तीन जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. तर एका व्यक्तीच्या मृत्यूची पुष्टी करण्यात आलीये. 

समोर आलेल्या माहितीनुसार डाडम खाण क्षेत्रातील डोंगराचा मोठा भाग खचल्यानं ही घटनाघडली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनानं त्वरित मदतकार्याला सुरूवात केली आहे. तसंच घटनास्थळी माध्यमांना आणि सामान्य जनतेलाही जाण्यास मज्जाव करण्यात आलाय. याशिवाय कृषी मंत्री जेपी दलाल आणि एसपी अजित सिंह शेखावत यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. "या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या याची संख्या सांगता येणार नाही. डॉक्टरांची टीमही घटनास्थळी दाखल झाली आहे. आम्ही शक्य तितक्या जणांचे प्राण वाचवण्याचे प्रयत्न करत आहोत," असे जेपी दलाल म्हणाले. डोगर खचल्यानं त्याखाली दबलेल्या गाड्यांमध्ये अनेक जण असण्याची शक्यता वक्तवण्यात येत आहे. सध्या बचावकार्य सुरू असून पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहे. या घटनेत खाणीमध्ये वापण्यात येणारी पोपलँड आणि अन्य काही मशिनही दबल्याचं सांगण्यात येत आहे. जखमींना सध्या रुग्णालयात दाखल करण्याचंही काम सुरू आहे.

टॅग्स :Haryanaहरयाणाlandslidesभूस्खलन