शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

"शेवटच्या श्वासापर्यंत थांबणार नाही"; फ्री ऑटो ॲम्ब्युलन्स चालवून वृद्धाने वाचवले शेकडो जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2023 13:08 IST

हरजिंदर सिंग 80 वर्षांचे आहेत. त्यांनी आतापर्यंत शेकडो जीव वाचवले आहेत. अनेक दशकांपासून ते दिल्लीत मोफत ऑटो ॲम्ब्युलन्स सेवा देत आहेत.

हरजिंदर सिंग हे गेली कित्येक वर्षे ऑटोरिक्षा चालवतात. त्यांच्या रिक्षात नेहमी फर्स्ट एड किट असतं. या किटमध्ये सर्व आपत्कालीन वस्तू जसे की बँडेज, अँटीसेप्टिक लोशन, बर्न क्रीम आणि पॅरासिटामॉल आहे. त्यांनी याबाबत प्रशिक्षणही घेतलं आहे. हरजिंदर सिंग 80 वर्षांचे आहेत. त्यांनी आतापर्यंत शेकडो जीव वाचवले आहेत. अनेक दशकांपासून ते दिल्लीत मोफत ऑटो ॲम्ब्युलन्स सेवा देत आहेत. शेवटच्या श्वासापर्यंत मानवतेची ही सेवा करत राहणार असल्याचे ते सांगतात.

हरजिंदर सिंग 80 वर्षांचे आहेत. यापूर्वी ते ट्रॅफिक वॉर्डन होते. ते ऑटोरिक्षा युनियनचे महासचिवही राहिले आहेत. हरजिंदरन यांनी 1964 मध्ये ऑटोरिक्षा चालवण्यास सुरुवात केली. त्यांना ऑटोरिक्षा चालवून 55 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. एकदाही त्यांनी वाहतुकीचा नियम मोडला नाही. तसेच वाहतूक पोलिसांनीही त्यांना कधीच अडवलं नाही. हरजिंदर सिंग यांची रिक्षा समोरून पाहिली तर राजधानी दिल्लीत चालणाऱ्या इतर रिक्षांप्रमाणेच दिसते. मागून पाहिल्यावर फरक समजू शकतो. 

मागच्या बाजूला रस्ते अपघातात जखमी झालेल्यांसाठी मोफत रुग्णवाहिका असा एक संदेश लिहिला आहे. दिल्लीतील पुरानंतर त्यांना ही कल्पना सुचली. त्या काळात त्यांनी शीख समाजातील इतर लोकांसोबत तत्परतेने सेवा केली. पुरानंतरही त्यांची सेवा सुरूच होती. त्यांनी मोफत ऑटो ॲम्ब्युलन्स सेवा सुरू केली. दिल्लीतील भजनपुरा भागात हरजिंदर मोठा मुलगा आणि कुटुंबासह राहतात. रस्त्यात मदतीची गरज असलेल्या लोकांना ते मदतीचा हात देतात. 

हरजिंदर आपल्या रिक्षामधून औषधे घेऊन जातात. त्यात प्रामुख्याने वापरल्या जाणाऱ्या औषधांचा समावेश असतो. एक डोनेशन बॉक्स देखील आहे. ते स्वत: कोणाकडे पैसे मागत नाही. पण ज्याला पैसे द्यायचे आहेत ते लोक बॉक्समध्ये पैसे टाकू शकतात. हरजिंदर त्याच पैशातून औषधं खरेदी करतात. वय लक्षात घेता त्यांनी आता हे काम करणं सोडावं असं कुटुंबीयांचं म्हणणं आहे. पण, शेवटच्या श्वासापर्यंत ही सेवा सुरू ठेवणार असल्याचं हरजिंदर सिंग सांगतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.