शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

हार्दिक पटेल काँग्रेसच्या बाजूने, भाजपाला विरोध कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 04:52 IST

अहमदाबाद : पाटीदार समुदायाला विशेष प्रवर्गात आरक्षण देण्याची मागणी काँग्रेसने मान्य केल्याने पाटीदार आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा घोषित केला आहे.

अहमदाबाद : पाटीदार समुदायाला विशेष प्रवर्गात आरक्षण देण्याची मागणी काँग्रेसने मान्य केल्याने पाटीदार आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा घोषित केला आहे. काँग्रेसने पाटीदार समुदायासाठी दिलेला आरक्षणाचा फॉर्म्युला एस.सी., एस.टी. आणि ओबीसी प्रवर्गासाठीच्या ५० टक्के आरक्षण कोट्याव्यतिरिक्त असेल, असे हार्दिक पटेल यांनी सांगितले.सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केलेल्या ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादेवर ते म्हणाले की, ही सर्वोच्च न्यायालयची केवळ सूचना आहे. काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास पाटीदार समुदायाला आरक्षण देण्यासाठी काँग्रेसचे सरकार सर्वेक्षण करील. त्यानुसार विधानसभेत एक विधेयक मांडून आरक्षण दिले जाईल.विधानसभा निवडणुकीतील जागावाटपांबाबत काँग्रेसशी कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही कोणत्याही जागेची मागणी केलेली नाही. तथापि, पाटीदार समुदायाच्या उमेदवारांना उभे करावे, असे आम्ही काँग्रेसला सांगितले आहे.पाटीदार अनामत आंदोलन समितीच्या (पास) काही सदस्यांनी निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारी दाखल केली आहे? त्यांचे काय? असे विचारले असता हार्दिक पटेल म्हणाले की, ते आता आमच्या संघटनेचे सदस्य नसतील. ‘पास’च्या सदस्यांना ५० लाख रुपयांचे आमिष दाखवून भाजपने त्यांना विकत घेण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही हार्दिक यांनी केली.>आरक्षणाचा फॉर्म्युला नेमका कसा आहे?पाटीदार समुदायाला विशेष प्रवर्गातहत किती टक्के आरक्षण दिले जाईल, याचा निर्णय सरकारनियुक्त आयोगाच्या सर्वेक्षणानंतरच केला जाईल. फॉर्म्युल्यानुसार अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) आणि इतर मागासवर्ग (ओबीसी) घटकांच्या ४९ टक्के आरक्षणाला हात न लावता काँग्रेसने आरक्षणाचा आजवर लाभ न मिळालेल्या समुदायांना (राज्यघटनेतील परिच्छेद ३१ सी आणि ४६ तहत) आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती हार्दिक पटेल यांनी दिली.>आरक्षण मर्यादेचा उल्लेख नाहीच५० टक्क्यांव्यतिरिक्त आरक्षणाची मर्यादा वाढविण्याच्या दृष्टीने कृती करण्यास सर्वोच्च न्यायालायने राजस्थान सरकारला मनाई केली होती. यावर हार्दिक पटेल म्हणाले की, ही (५० टक्के आरक्षणाची मर्यादा) सर्वोच्च न्यायालयाची सूचना आहे. भारतीय राज्यघटनेत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेसंदर्भात कोणताही उल्लेख नाही. तेव्हा माझ्या मते ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देता येऊ शकते.>गुजरातेत माझा लढा भाजपाविरुद्ध आहे. त्यामुळे आमचा निवडणुकीत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे काँग्रेसला पाठिंबा असेल. कारण काँग्रेसने आमची आरक्षणाची मागणी मान्य केली आहे. निवडणूक जाहीरनाम्यातही आमच्या मागण्यांचा समावेश करण्याचा शब्द काँग्रसेने आम्हाला दिला आहे.- हार्दिक पटेल

टॅग्स :hardik patelहार्दिक पटेलGujaratगुजरातGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017BJPभाजपाIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस