शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

Happy Birthday Narendra Modi : 'नरेंद्र मोदींना हवा होता संन्यास, नको होतं राजकारण', पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 19:37 IST

सन 1966 साली बेलूर मठाचे स्वामी आत्मास्थानंद राजकोट येथील आश्रमात आले होते. त्यावेळी नरेंद्र मोदी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी प्रेरीत होते.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींची साधना आणि तपश्चर्येबद्दल आपण अनेकदा ऐकले आहे. तसेच एका सामान्य कुटुंबातील मुलगा ते देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचण्याची मजल नरेंद्र मोदींनी मारली. आज मोदींचा थाट-माट आणि राजकारणातील त्यांची धमक आपणास पाहायला मिळत आहे. मात्र, मोदी या राजकारणापासून दूर राहू इच्छित होते. राजकारणात येण्याची त्यांची मूळीच इच्छा नव्हती. ते संन्यासी बनू इच्छित होते. पण, एका गुरुचे त्यांच्या जीवनात आगमन झाले आणि मोदींचा जीवनप्रवास बदलला.

सन 1966 साली बेलूर मठाचे स्वामी आत्मास्थानंद राजकोट येथील आश्रमात आले होते. त्यावेळी नरेंद्र मोदी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी प्रेरीत होते. त्यामुळे मोदी स्वामी आत्मास्थानंद यांना भेटण्यासाठी राजकोट आश्रमात पोहोचले. त्यापूर्वी मोदी हे अध्यात्म शिकत होते. त्यामुळे मोदींनी स्वामींसोबत राहून अध्यात्म शिकण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, स्वामींनी मोदींना इच्छा धुडकावत तूम्ही संन्यास घेण्यासाठी जन्मले नाहीत. तसेच, राजकोट आश्रम सन्यासी बनण्याची दीक्षा देत नसल्याचेही स्वामींनी म्हटले. जर, तुम्हाला संन्यास घ्यायचा असेल तर तुम्हाला बेलूर मठात जावे लागले, त्यासाठी स्वामींनी बेलूर मठाचे अधिपती माधवानंद यांना याबाबत चिठ्ठी लिहिली. त्यानंतर, मोदींनी स्वामी माधवानंद यांची भेट घेतली. मात्र, स्वामी माधवानंद यांनीही मोदींची इच्छा धुडकावत, तुम्ही जनतेची सेवा करण्यासाठी आहात, संन्यास घेण्यासाठी नाही, असे सांगितले. त्यामुळे आपले गुरू स्वामी आत्मास्थानंद यांच्यासोबत मोदी पुन्हा राजकोट आश्रमात परतले. त्यानंतर, मोदींनी आरएसएसचे सदस्यत्व स्विकारले आणि काही दिवसांतच ते राजकारणात सक्रीय झाले. गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतरही मोदींनी स्वामी आत्मास्थानंद यांचे दर्शन घेतले. तसेच पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतरही मोदींच्या पॉकेटमध्ये एक फूल होते. जे फूल स्वामी आत्मास्थानंद यांनी मोदींनी आशिर्वाद म्हणून दिले होते. दरम्यान, स्वामी आत्मास्थानंद यांनीच मोदींना राजकारणात सक्रीय होण्यास सूचवले होते, असेही सांगण्यात येते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारणChief Ministerमुख्यमंत्री