शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

अॅसिड हल्लेखोराला फाशी

By admin | Updated: July 26, 2014 02:35 IST

विवाहित प्रेयसीवर अॅसिड फेकून तिला ठार करणा:या युवकाला मरेर्पयत फाशीची शिक्षा ठोठावून, सुडाने आंधळ्या झालेल्या प्रेमवीराला एक धडा शिकविला आहे.

मुरैना : मध्यप्रदेशतील एका न्यायालयाने, विवाहित प्रेयसीवर अॅसिड फेकून तिला ठार करणा:या युवकाला मरेर्पयत फाशीची शिक्षा ठोठावून, सुडाने आंधळ्या झालेल्या प्रेमवीराला एक धडा शिकविला आहे. मुरैना जिल्ह्यातील अंबाह येथील न्यायालयाने हा निकाल दिला.
अपर सत्र न्यायाधीश पी.सी. गुप्ता यांनी, योगेंद्रसिंग तोमर या पोरसा येथील युवकाला, रुबी गुप्ता या तरुणीवर अॅसिड फेकून तिला ठार केल्याबद्दल दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. त्याचे हे कृत्य क्रूर अपराधाचे असल्याचे सांगून, तो मृत होईर्पयत त्याला फाशीवर लटकविले जावे, असेही निर्देश दिले आहेत. या गुन्ह्यासाठी जन्मठेपेची शिक्षा पुरेशी नसल्याने त्याला मृत्युदंड दिला जात आहे, असे निकालात नमूद केले आहे. 
एखाद्या व्यक्तीवर अॅसिड फेकण्याच्या गुन्ह्याकरिता फाशीची झालेली शिक्षा हे देशातले पहिलेच उदाहरण ठरावे. 
2क् जुलै 2क्13 रोजी रुबी गुप्ता ही आपल्या वडिलांच्या घरी आली होती. ती आपल्या खोलीत झोपली असताना योगेंद्रने घरात शिरून तिच्यावर अॅसिड फेकले होते. तिच्या किंकाळ्या ऐकून घरातील मंडळी धावली तेव्हा योगेंद्रने त्यांच्याही अंगावर अॅसिड फेकले. या अॅसिड हल्ल्यात चंद्रकला, जोनू व राजू हे तिघेही जखमी झाले होते. उपचारादरम्यान रुबीचे निधन झाले होते. 
योगेंद्र व रुबीची मैत्री होती व लग्नानंतरही तिने आपल्यासोबत संबंध ठेवावेत, असा त्याचा आग्रह होता. मात्र, रुबीने त्याला नकार दिल्यानंतर सूड भावनेने त्याने तिच्यावर अॅसिड हल्ला केला होता. 
सर्वोच्च न्यायालयाचे दिशानिर्देश
हे पदार्थ 18 वर्षाखालील व्यक्तीला विकले जाऊ नयेत, असे सांगून त्याच्या खरेदीसाठी व्यक्तीजवळ ओळखपत्र असणो अनिवार्य केले जावे, असेही सुचविण्यात आले आहे. याखेरीज पीडित व्यक्तीला एक लाख रुपयांची नुकसानभरपाई घटनेच्या 15 दिवसांच्या आत दिली जावी यावर राज्य सरकारने लक्ष द्यावे, असेही सूचित केले आहे. (वृत्तसंस्था)
 
च्नवी दिल्ली : प्रेमप्रकरणांमध्ये सोडून गेलेल्या जोडीदारावर अॅसिडने हल्ल्याच्या वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त करीत सर्वोच्च न्यायालयाने, समाजातील ही परिस्थिती कीव करण्याजोगी असल्याचा अभिप्राय नोंदवला आहे. न्यायालयाने ही समस्या सोडविण्याबाबत केंद्राच्या ढिलाईच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
 
च्सरन्यायाधीश आर.एम. लोढा यांच्या अध्यक्षतेतील खंडपीठाने ही परिस्थिती कीव करण्यासारखी असल्याचे नमूद करीत अशा प्रकारच्या घटना नेहमीच होत असल्याकडे लक्ष वेधले आहे. या घटनांबाबत सरकारच्या सुस्त दृष्टिकोनावरही सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले असून, या हल्ल्यातील पीडित व्यक्तीच्या पुनर्वसनासाठी योजना आखण्याकरिता केंद्र व राज्यांना नोटीस जारी केली जावी, असे निर्देश दिले आहेत. 
 
च्याआधी सर्वोच्च न्यायालयाने यंदा 31 मार्चर्पयत अॅसिडच्या विक्रीबाबत नियमावली तयार करणो व दुस:या विषारी पदार्थाच्या दुरुपयोगाला रोखण्यासाठी नियम बनविण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते. 
 
च्बिहारमधील एका खासगी संस्थेने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने वरील आदेश दिले आहेत. ज्या व्यक्तींवर अॅसिड हल्ला झाला असेल, अशा व्यक्तीच्या पुनर्वसनाची जबाबदारी सरकारने घ्यावी व त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात 
आणले जावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.