शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2024 13:49 IST

तुमच्यात जिद्द जास्त असेल तर जगातील कोणताही अडथळा तुम्हाला तुमचे ध्येय गाठण्यापासून रोखू शकत नाही.

जर तुमच्यात जिद्द जास्त असेल तर जगातील कोणताही अडथळा तुम्हाला तुमचे ध्येय गाठण्यापासून रोखू शकत नाही. छपरा शहरातील भगवान बाजार येथे राहणाऱ्या निर्मला कुमारी हिने हे सिद्ध करून दाखवलं आहे. निर्मला दोन्ही पायांनी दिव्यांग आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून तिने हजारो लोकांचा जीव वाचवला आहे. ज्यावेळी आपण कोरोनाच्या भीतीने घरात बसलो होतो. त्यावेळी ती घरापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या गावात लोकांची कोरोना चाचणी करत होती.

निर्मला कुमारी हिच्या कुटुंबीयांनी तिला ड्युटी सेंटरमध्ये जाण्यास मनाई केली होती. पण तिने तिच्या घरातील लोकांना समजावून सांगितलं आणि तिला सेंटरमध्ये घेऊन जाण्यास सांगितलं, यानंतर तिच्या घरातील लोकांनी तिला सेंटरमध्ये सोडलं, त्यानंतर तिने ठरवलं की काहीही झालं तरी ती अशा पीडित लोकांना मरताना पाहू शकत नाही. दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही निर्मलाने कोरोनाला आव्हान दिले आणि तपासाची जबाबदारी स्वीकारली. 

निर्मलाचा ​​उदात्त हेतू पाहून सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावले. मात्र पण एक दिवस निर्मलालाच कोरोनाची लागण झाली, असे असूनही निर्मलाचे मनोबल खूप उंचावले होते. निर्मला 2 महिने कोरोनाचा सामना करत राहिली, शेवटी तिच्या हिंमतीने कोरोनाचा पराभव केला आणि जिंकली. पुन्हा एकदा आरोग्य सेवा देण्यासाठी निर्मला मैदानात उतरली. 

निर्मला कुमारी म्हणाली की, मला सुरुवातीपासूनच आरोग्य क्षेत्रात सेवा करायची होती. जे स्वप्न मी माझ्या मेहनतीने आणि समर्पणाने साकार केलं आहे. मला जिथे कुठेही सेवा करण्यासाठी पाठवलं जातं तिथे मी निःस्वार्थपणे सेवा करते. मुलांच्या लसीकरणासाठी मी मुख्यालयापासून 35 ते 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या गावात गेली आहे. 2015 मध्ये आरोग्य सेवा देण्यास सुरुवात केली आणि आजपर्यंत सेवा देत आहे. न्यूज 18 हिंदीने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी