शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
2
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
3
PM Modi Birthday : जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
4
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
5
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
6
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
7
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
8
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
9
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
10
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
11
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
12
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
13
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
14
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
15
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
16
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
18
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
19
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
20
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली

... तर छत्तीसगडचे अर्धे लोक सिद्ध करू शकणार नाहीत नागरिकत्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2019 07:00 IST

मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे प्रतिपादन । बहुतांश नागरिकांचे पूर्वज अशिक्षित; ५० ते १०० वर्षांपूर्वीचे दस्तावेज आणायचे कुठून?

रायपूर : छत्तीसगडमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकांकडे जमिनी नाहीत आणि जमिनीचे कुठले रेकॉर्ड नाही. त्यामुळे ‘राष्ट्रीय नागरिकत्व रजिस्टर’ची (एनआरसी) अंमलबजावणी केल्यास हे लोक आपले नागरिकत्वच सिद्ध करू शकणार नाहीत, असे प्रतिपादन छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केले.

बघेल यांनी पत्रकारांना सांगितले की, छत्तीसगडमध्ये २.८० कोटी लोक राहतात. यातील अर्ध्यापेक्षा जास्त नागरिकांचे पूर्वज अशिक्षित होते. भूमिहीन होते. त्यांच्याकडे कसलेही दस्तावेज नव्हते. ते राज्याच्या विविध खेड्यांत अथवा इतर राज्यांतही स्थलांतरित झाले. त्यांच्या वंशजांनी ५० ते १०० वर्षांपूर्वीचे दस्तावेज कुठून आणायचे? १९०६ साली इंग्रजांनी ओळख पडताळणी योजना आणली होती. या योजनेला महात्मा गांधी यांनी पूर्ण शक्तिनिशी विरोध केला होता. मी एनआरसीला विरोध करीन.

कर्नाटकातील हिंसाचाराची चौकशी करणार -येदीयुरप्पा

मंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येदीयुरप्पा यांनी शनिवारी हिंसाचारग्रस्त मंगळुरू शहराला भेट देऊन पाहणी केली.नंतर त्यांनी पत्रकारांना सांगितले की, ‘हिंसाचाराची चौकशी केली जाईल. तसेच पीडिताना कायद्यानुसार भरपाई दिली जाईल. संचारबंदी उठविली जावी, अशी शहरातील प्रत्येकाची इच्छा आहे.

आज ३ ते ६ या काळात संचारबंदी उठविली जाईल. उद्या संपूर्ण दिवसभर संचारबंदी नसेल. रात्रीची संचारबंदी मात्र कायम राहील.’ मंगळुरूत पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन जण ठार झाले होते.केरळमध्ये काँग्रेसचे आंदोलन तीव्रकोची : केरळमध्ये काँग्रेसने शनिवारी नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील (सीएए) आंदोलन तीव्र केले. शनिवारी राज्यातील सर्व जिल्ह्यांत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली. ज्येष्ठ काँग्रेस नेते रमेश चेन्निथला, मुल्लापल्ली रामचंद्रन, शशी थरूर, बेनी बेहनन आणि एम. एम. हसन यांच्यासह पक्षाचे आमदार, खासदार आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले.सरकारने हटवादी भूमिका सोडावी -मायावतीलखनौ : ‘सीएए’ आणि ‘एनआरसी’प्रकरणी सरकारने हटवादी भूमिका सोडून द्यावी आणि हे निर्णय मागे घ्यावेत, असे आवाहन बसपा नेत्या मायावती यांनी केले आहे. मायावती यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले की, ‘सीएए’ आणि ‘एनआरसी’ला आता रालोआमध्येच विरोध सुरू झाला आहे. त्यामुळे सरकारने हटवादी भूमिका सोडून हे निर्णय मागे घ्यावेत.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकChhattisgarhछत्तीसगडcongressकाँग्रेसKeralaकेरळmayawatiमायावती