शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

संघाच्या वाटेला गेल्या नसत्या, तर आज गौरी जिवंत राहिल्या असत्या- भाजपा आमदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 15:33 IST

गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर भाजपा आमदारांनं त्यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केलं आहे. 'गौरी लंकेश नेहमीच स्वयंसेवक संघ आणि भाजपाविरोधात गरळ ओकत होत्या. अनेकदा त्या भाजपाच्या विरोधातही लिहायच्या. स्वयंसेवकांच्या एवढ्या हत्या झाल्या त्याविरोधात त्यांनी आजपर्यंत कधीही आवाज उठवलेला ऐकिवात नाही. त्या नेहमीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांवर टीका करायच्या. त्यांनी तसं केलं नसतं तर आज त्या आपल्यात असत्या, असं वादग्रस्त वक्तव्य कर्नाटकातील भाजपा आमदारानं केलं आहे.

ठळक मुद्देगौरी लंकेश यांच्या हत्येनंतर भाजपा आमदारांनं त्यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केलं गौरी लंकेश यांनी स्वयंसेवकांबाबत असं काही तरी लिहिलं नसतं तर त्या आज जिवंत राहिल्या असत्या,' असं जीवराज यांनी म्हटलं आहे.

 बंगळुरू, दि. 8 - गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर भाजपा आमदारांनं त्यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केलं आहे. 'गौरी लंकेश नेहमीच स्वयंसेवक संघ आणि भाजपाविरोधात गरळ ओकत होत्या. अनेकदा त्या भाजपाच्या विरोधातही लिहायच्या. स्वयंसेवकांच्या एवढ्या हत्या झाल्या त्याविरोधात त्यांनी आजपर्यंत कधीही आवाज उठवलेला ऐकिवात नाही. त्या नेहमीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांवर टीका करायच्या. त्यांनी तसं केलं नसतं तर आज त्या आपल्यात असत्या, असं वादग्रस्त वक्तव्य कर्नाटकातील भाजपा आमदारानं केलं आहे. कर्नाटकातील भाजपाचे आमदार डी. एन. जीवराज यांनी गौरी लंकेश यांच्या हत्येसंदर्भात खळबळजनक विधान केलं आहे. आमदार डी. एन. जीवराज यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात गोंधळ उडण्याची शक्यता आहे. भाजप युवा मोर्चाला संबोधित करताना कर्नाटकातील भाजपाचे आमदार डी. एन. जीवराज बोलत होते. जीवराज यांच्या या भाषणाचा व्हिडीओ 'इंडिया टुडे'कडे असल्यानं त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 'काँग्रेसच्या राज्यात संघाच्या स्वयंसेवकांना कशा प्रकारे जीव गमावावे लागले आहेत हे आम्ही डोळ्यांदेखत पाहिलंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एवढ्या कार्यकर्त्यांच्या हत्या होऊनसुद्धा त्या संघाच्याच विरोधात पोटतिडकीनं लिहीत होत्या. 'चड्डीवाल्यांचे अंत्यसंस्कार' हा त्यांच्या लेखात तर त्यांनी स्वयंसेवकांवर वादग्रस्त टीका केली होती. गौरी लंकेश या माझ्या बहिणीसारख्या होत्या. परंतु त्या सदोदित भाजपा आणि संघाविरोधात चुकीच्या माहितीच्या आधारवर लेख लिहित होत्या. त्यांच्या लिखाणाची भाषाशैली न पटणारी होती. त्यांनी स्वयंसेवकांबाबत असं काही तरी लिहिलं नसतं तर त्या आज जिवंत राहिल्या असत्या,' असं जीवराज यांनी म्हटलं आहे.जीवराज यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसनंही त्यांच्यावर निशाणा साधला आहे. एका आमदारानं अशा आशयाचं  विधान करणं चुकीचं आहे. त्यांना यातून काय सुचवायचं आहे?,' असा प्रश्न कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी उपस्थित केला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी श्रृंगेरी येथे या प्रकरणी जीवराज यांच्याविरोधात तक्रार नोंदवली आहे. परंतु जीवराज यांनी आपल्या विधानाचा विपर्यास केल्याचा आरोप केला आहे. 

टॅग्स :Gauri Lankesh Murderगौरी लंकेश हत्या प्रकरण