शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

मार्शल आले नसते, तर उपसभापतींवर हल्ला झाला असता- रविशंकर प्रसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2020 21:43 IST

राज्यसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी घातलेल्या गोंधळावरून सत्ताधाऱ्यांचं टीकास्त्र

नवी दिल्ली: मोदी सरकारनं लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही शेतीशी संबंधित विधेयकं मंजूर करून घेतली. मात्र विधेयकांवर चर्चा सुरू असताना राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. विरोधी पक्षाच्या खासदारांनी उपसभापतींच्या समोरील नियम पुस्तिकेची तोडफोड केली. माईकहीदेखील तोडण्यात आले. यावरून आता भाजपनं विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मोदी सरकारमधील तीन मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत राज्यसभेत झालेल्या गोंधळावरून विरोधकांवर टीका केली.केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, प्रल्हाद जोशी आणि पीयूष गोयल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 'राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांचा अनादर झाला. ही घटना अतिशय दु:खद आहे. विरोधी पक्षाच्या खासदारांचा विधेयकांना विरोध होता. त्यांनी त्यांच्या जागेवर बसून विधेयकाच्या विरोधात मतदान करायला हवं होतं. उपसभापतींनी १३ वेळा खासदारांना त्यांच्या जागेवर जाण्यास सांगितलं. मात्र तरीही खासदार ऐकले नाहीत. संसदेसाठी कालचा दिवस अतिशय लज्जास्पद होता. माईक तोडण्यात आले. नियम पुस्तिका फाडण्यात आली. त्यावेळी तिथे मार्शल नसते, तर उपसभापतींवर हल्लादेखील झाला असता,' असं प्रसाद म्हणाले.काल सहा मंत्र्यांची पत्रकार परिषद; विरोधकांवर टीकास्त्रराज्यसभेत खासदारांनी घातलेल्या गोंधळावरून काल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह सहा मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला होता. 'राज्यसभेत घडलेला प्रकार अतिशय दु:खद, लज्जास्पद आणि दुर्दैवी होता. विरोधकांच्या वर्तणुकीमुळे लोकशाहीच्या प्रतिष्ठेला धक्का लागला आहे,' अशा शब्दांत सिंह यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं. राज्यसभेतल्या गोंधळानंतर राजनाथ यांच्यासह सहा मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांना प्रत्युत्तर दिलं होतं.

'राज्यसभेत शेतीशी संबंधित २ विधेयकांवर चर्चा सुरू होती. त्यावेळी सदनात जो प्रकार घडला, तो अतिशय दु:खद आणि दुर्दैवी होता. यापेक्षा पुढे जाऊन बोलायचं झाल्यास झालेली घटना लज्जास्पद होती, असं मी म्हणेन. राज्यसभेच्या उपसभापतींना काय वागणूक देण्यात आली, ती सर्वांनी पाहिली,' असं राजनाथ म्हणाले. 'विरोधी पक्षाच्या खासदारांच्या वर्तनामुळे लोकशाहीच्या प्रतिष्ठेला धक्का लागला आहे. जेव्हा जेव्हा संसदेत मर्यादा ओलांडली जाते, तेव्हा तेव्हा लोकशाहीच्या प्रतिष्ठेला धक्का बसतो. सभागृहात चर्चा घडवून आणणं सत्ताधाऱ्यांची जबाबदारी आहे. पण संसदेची प्रतिष्ठा राखणं विरोधकांचंही कर्तव्य आहे,' असं सिंह यांनी म्हटलं.

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभा