शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

गावकरी म्हणाले, नवं घर शोधा! पाकिस्तानात गेलेल्या अंजूच्या वडिलांसमोरील अडचणी वाढल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 16:04 IST

आपल्या मुलाला आणि पतीला भारतात सोडून अंजू पाकिस्तानमध्ये तिचा प्रियकर नसरुल्लाहला भेटायला गेली होती.

प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तानात जाणार्‍या अंजूच्या कुटुंबीयांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. अंजूच्या वडिलांना आणि कुटुंबीयांना आता गावाबाहेर काढण्याचा विचार केला जात आहे. अंजूमुळे गावाची बदनामी होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे, त्यामुळे ते गया प्रसाद थॉमस यांना स्वत:साठी नवीन जागा शोधण्यास सांगत आहेत.

आपल्या मुलाला आणि पतीला भारतात सोडून अंजू पाकिस्तानमध्ये तिचा प्रियकर नसरुल्लाहला भेटायला गेली होती. पाकिस्तानमधील अंजूचे फोटो सोशल मीडियावर सातत्याने व्हायरल होत आहेत. अंजूने नसरुल्लाहशी पाकिस्तानात निकाह केल्याचं म्हटलं जात आहे. तिने तिचं नाव आता फातिमा केलं आहे. गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

अंजू तिच्या वडिलांना भेटायला आली तर काय करणार असा प्रश्न ग्रामस्थांना विचारण्यात आला. त्यावर असे उत्तर आले की, असा प्रकार घडला तर वडील व कुटुंबालाही गावाबाहेर हाकलून देऊ. गावकऱ्यांनी सांगितले की, भारत सरकार या प्रकरणाकडे लक्ष देत आहे. पण आम्ही तिला इथे येऊ देणार नाही. 

अंजूचे वडील गया प्रसाद यांनी आमचा तपास करा, आम्हाला काही अडचण नाही. आमच्याकडे कोणत्याही संशयास्पद वस्तू नाहीत. मी एक साधा माणूस आहे मी कोणत्याही प्रकारच्या चौकशीसाठी तयार आहे. माझ्या मनातील वेदना कोणीही समजू शकत नाही असं म्हटलं आहे. अंजूमुळे माझे संपूर्ण कुटुंब अडचणीत आहे. माझ्या मुलाची नोकरी गेली. माझं कुटुंब विखुरलं. आता आम्ही फक्त देवाला विनंती करतो की आम्हाला त्याने न्यावं. असं गुदमरून पण जगू शकत नाही असंही म्हटलं.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान