शहरं
Join us  
Trending Stories
1
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
2
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
3
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
4
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
5
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
6
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
7
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
8
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
9
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
10
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
11
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
12
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
13
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
14
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
15
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
16
'पाश्चिमात्य दबावातही भारत-रशिया संबंध मजबूत', अमेरिकेचा उल्लेख करत रशियाची मोठी प्रतिक्रिया
17
Nashik: येवल्यात छगन भुजबळांच्या 'पंच'मुळे उद्धवसेना 'सलाइन'वर, 'शिंदेसेने'लाही दिला शह
18
एकनाथ शिंदेंच्या तक्रारीनंतर अमित शाहांकडून रवींद्र चव्हाणांची पाठराखण; "पक्षबांधणी सुरूच ठेवा..."
19
२० दिवसापूर्वीच थार घेतलेली, कोकणात फिरण्यासाठी निघाले होते, चौघांचा मृतदेह सापडला, दोनजण बेपत्ता; ओळख पटली, नाव आली समोर
20
Pune Hit And Run: टेम्पोने उडवले, सात वर्षाच्या अनुरागने जागेवरच सोडला जीव, आजोबा आणि भाऊ थोडक्यात बचावले
Daily Top 2Weekly Top 5

कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत काँग्रेसच्या 44 आमदारांची गुजरातवापसी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2017 12:39 IST

फोडाफोडीचे राजकारण होण्याच्या पार्श्वभूमीवर बंगळुरूमध्ये पाठवण्यात आलेले गुजरात काँग्रेसमधील 44 आमदारांची सोमवारी सकाळी कडक सुरक्षा व्यवस्थेत अहमदाबादमध्ये वापसी झाली आहे

बंगळुरू/ अहमदाबाद, दि. 7 - फोडाफोडीचे राजकारण होण्याच्या पार्श्वभूमीवर बंगळुरूमध्ये पाठवण्यात आलेले गुजरात काँग्रेसमधील 44 आमदारांची सोमवारी सकाळी कडक सुरक्षा व्यवस्थेत अहमदाबादमध्ये वापसी झाली आहे. गुजरातमध्ये 8 ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपल्या 44 आमदारांना भाजपाच्या ‘शिकारी’पासून वाचविण्यासाठी बंगळुरूत हलविले होते. गेल्या 10 दिवसांपासून काँग्रेसचे हे 44 आमदार बंगळुरूतील एका रिसॉर्टमध्ये राहत होते. 

सोमवारी पहाटे जवळपास 4.45 वाजण्याच्या सरदार वल्लभभाई एअरपोर्टवर पोहोचलेल्या सर्व आमदारांना अहमदाबादपासून जवळपास 77 किलोमीटर अंतरावर असलेल्या निजानंद रिसॉर्टमध्ये नेण्यात आले आहे. या आमदारांना निवडणुकीपर्यंत येथेच ठेवण्यात येणार आहे. 

आमदारांच्या सुरक्षेसाठी एअरपोर्टबाहेर रविवारीच सकाळी 8 वाजल्यापासून पोलीस तैनात करण्यात आले होते. दरम्यान, काँग्रेसचे आमदार बंगळुरूमध्ये ज्या रिसॉर्टमध्ये थांबले होते ते कर्नाटकचे ऊर्जामंत्री डी.के. शिवकुमार यांचे होते.  बुधवारी ( 2 ऑगस्ट )सकाळी आयकर विभागाने  डी.के. शिवकुमार यांच्या घरावर छापा टाकला होता. तसंच काँग्रेस आमदारांना ज्या रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले होते त्यावरही आयकर विभागाने छापेमारी केली होती. भाजपाने सुडबुद्धीने ही कारवाई केल्याचे आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता.   

44 आमदार होते बंगळुरूमध्ये  

गुजरातमध्ये 8 ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपल्या ४४ आमदारांना भाजपाच्या ‘शिकारी’पासून वाचविण्यासाठी बंगळुरूत हलवले होते. काँग्रेसच्या सहा आमदारांनी राजीनामा दिला असून, त्यातील तीन भाजपात दाखल झाले आहेत. काँग्रेसचे नेते अहमद पटेल गुजरातमधून राज्यसभा निवडणूक लढवीत आहेत. पक्षाच्या ५७ पैकी ६ आमदारांनी राजीनामा दिल्याने संकट उभे ठाकले आहे. काँग्रेसचे महासचिव निशित व्यास म्हणाले होते की, ४४ आमदारांना बंगळुुरूला हलवण्यात आले. व्यास या आमदारांसोबत आहेत. सुरक्षेसाठी हे पाऊल उचलले आहे. या आमदारांना धमक्या दिल्या जात आहेत, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी काँग्रेसचा हा आरोप खोडून काढताना हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. आमचा याच्याशी संबंध नाही, असा दावा केला.