शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
2
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
3
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
5
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
6
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
7
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
8
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
9
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
10
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
11
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
12
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
13
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
14
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
15
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
16
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
17
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
18
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
19
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
20
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”

कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत काँग्रेसच्या 44 आमदारांची गुजरातवापसी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2017 12:39 IST

फोडाफोडीचे राजकारण होण्याच्या पार्श्वभूमीवर बंगळुरूमध्ये पाठवण्यात आलेले गुजरात काँग्रेसमधील 44 आमदारांची सोमवारी सकाळी कडक सुरक्षा व्यवस्थेत अहमदाबादमध्ये वापसी झाली आहे

बंगळुरू/ अहमदाबाद, दि. 7 - फोडाफोडीचे राजकारण होण्याच्या पार्श्वभूमीवर बंगळुरूमध्ये पाठवण्यात आलेले गुजरात काँग्रेसमधील 44 आमदारांची सोमवारी सकाळी कडक सुरक्षा व्यवस्थेत अहमदाबादमध्ये वापसी झाली आहे. गुजरातमध्ये 8 ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपल्या 44 आमदारांना भाजपाच्या ‘शिकारी’पासून वाचविण्यासाठी बंगळुरूत हलविले होते. गेल्या 10 दिवसांपासून काँग्रेसचे हे 44 आमदार बंगळुरूतील एका रिसॉर्टमध्ये राहत होते. 

सोमवारी पहाटे जवळपास 4.45 वाजण्याच्या सरदार वल्लभभाई एअरपोर्टवर पोहोचलेल्या सर्व आमदारांना अहमदाबादपासून जवळपास 77 किलोमीटर अंतरावर असलेल्या निजानंद रिसॉर्टमध्ये नेण्यात आले आहे. या आमदारांना निवडणुकीपर्यंत येथेच ठेवण्यात येणार आहे. 

आमदारांच्या सुरक्षेसाठी एअरपोर्टबाहेर रविवारीच सकाळी 8 वाजल्यापासून पोलीस तैनात करण्यात आले होते. दरम्यान, काँग्रेसचे आमदार बंगळुरूमध्ये ज्या रिसॉर्टमध्ये थांबले होते ते कर्नाटकचे ऊर्जामंत्री डी.के. शिवकुमार यांचे होते.  बुधवारी ( 2 ऑगस्ट )सकाळी आयकर विभागाने  डी.के. शिवकुमार यांच्या घरावर छापा टाकला होता. तसंच काँग्रेस आमदारांना ज्या रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले होते त्यावरही आयकर विभागाने छापेमारी केली होती. भाजपाने सुडबुद्धीने ही कारवाई केल्याचे आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता.   

44 आमदार होते बंगळुरूमध्ये  

गुजरातमध्ये 8 ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपल्या ४४ आमदारांना भाजपाच्या ‘शिकारी’पासून वाचविण्यासाठी बंगळुरूत हलवले होते. काँग्रेसच्या सहा आमदारांनी राजीनामा दिला असून, त्यातील तीन भाजपात दाखल झाले आहेत. काँग्रेसचे नेते अहमद पटेल गुजरातमधून राज्यसभा निवडणूक लढवीत आहेत. पक्षाच्या ५७ पैकी ६ आमदारांनी राजीनामा दिल्याने संकट उभे ठाकले आहे. काँग्रेसचे महासचिव निशित व्यास म्हणाले होते की, ४४ आमदारांना बंगळुुरूला हलवण्यात आले. व्यास या आमदारांसोबत आहेत. सुरक्षेसाठी हे पाऊल उचलले आहे. या आमदारांना धमक्या दिल्या जात आहेत, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी काँग्रेसचा हा आरोप खोडून काढताना हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. आमचा याच्याशी संबंध नाही, असा दावा केला.