शहरं
Join us  
Trending Stories
1
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
2
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
3
दक्षिण कोरियाने मैत्रीचा हात पुढे केला, किम जोंग यांची बहिण म्हणाली, "कोणताही रस नाही..."
4
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
6
VIDEO: जाडेजा-स्टोक्समध्ये हात मिळवण्यावरून राडा, सामना संपल्यावर 'शेक-हँड' नाकारलं?
7
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
8
‘डान्सबारमध्ये नाचणाऱ्या मुली लाडक्या बहिणी नाहीत का? मुली नाचवणाऱ्यांना वाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते?’, काँग्रेसचा सवाल   
9
Thailand Shooting: थायलंडमध्ये भर बाजारात बेछूट गोळीबार, सहा जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वत:वरही झाडली गोळी  
10
महालक्ष्मी योगात नागपंचमी: ८ राशींवर शिव-लक्ष्मी कृपा, अपार धन-धान्य-लाभ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
Mangalagauri 2025: मंगळागौरीचे सौभाग्यदायी व्रत कसे केले जाते? जाणून घ्या संपूर्ण पूजाविधी
12
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
13
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
14
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
15
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
16
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
17
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
18
कुठे गायब झाली 'तेरे नाम'मधील भिकारीची भूमिका करणारी अभिनेत्री? पूर्ण बदललाय तिचा लूक
19
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
20
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन

गुजरात दंगलीशी सबंधित 9 पैकी 8 खटले बंद, 'या' प्रकरणाची सुनावणी सुरू राहणार- सर्वोच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 17:45 IST

'इतका वेळ निघून गेल्यानंतर आता या प्रकरणांवर सुनावणी करण्यात काही अर्थ नाही.'

नवी दिल्ली: गुजरातमध्ये 2002 साली झालेल्या दंगलीशी संबंधित 9 पैकी 8 खटले बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या सर्व प्रकरणांशी संबंधित अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित होत्या. सरन्यायाधीश यूयू ललित यांच्या नेतृत्वाखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने मंगळवारी सांगितले की, इतका वेळ निघून गेल्यानंतर आता या प्रकरणांवर सुनावणी करण्यात काही अर्थ नाही. दरम्यान, अन्य एका प्रकरणात न्यायालयाने कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांना दिलासा मिळावा म्हणून अपील करण्याची परवानगी दिली.

सुप्रीम कोर्टाने सांगितले की, गुजरात दंगलीशी संबंधित 9 पैकी 8 प्रकरणांमध्ये कनिष्ठ न्यायालयांनी निकाल दिला आहे. दंगलीदरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या चौकशीची मागणी करणाऱ्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या म्हणजेच NHRCच्या याचिकेचा यात समावेश आहे. न्यायालयाने दंगलग्रस्तांच्या रिट याचिका आणि सिटीझन्स फॉर जस्टिस नावाच्या एनजीओचाही विचार केला. 2003-2004 मध्ये दाखल केलेल्या याचिकेत एनजीओने गुजरात पोलिसांकडून दंगलीचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली होती.

9 पैकी 8 खटल्यांची सुनावणी पूर्णसरन्यायाधीश यूयू ललित यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयात हा निकाल दिला. या खंडपीठात न्यायमूर्ती रवींद्र भट आणि न्यायमूर्ती जेबी परडीवाला यांचा समावेश आहे. खंडपीठाने सांगितले की, गुजरात दंगलीशी संबंधित 9 प्रकरणांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच एसआयटी स्थापन केली आहे. त्यापैकी 8 प्रकरणांची सुनावणी पूर्ण झाली आहे. नरोडा गावाशी संबंधित खटल्याची सुनावणी अद्याप सुरू आहे. खंडपीठाने सांगितले की, पीडित कुटुंबांच्या वकीलांनीही एसआयटीच्या वक्तव्याशी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे सर्व प्रकरणांना काही अर्थ नाही. त्यामुळे या याचिकांवर अधिक विचार करण्याची गरज नाही, असे न्यायालयाचे मत आहे. 

नरोडा प्रकरणात एसआयटी कायदेशीर पावले उचलू शकतेएसआयटीचे वकील मुकुल रोहतगी यांनी न्यायालयाला सांगितले की, नऊ प्रकरणांपैकी फक्त नरोडा गावातील हिंसाचाराचे प्रकरण प्रलंबित आहे आणि त्यातही अंतिम युक्तिवाद प्रलंबित आहेत. उर्वरित 8 प्रकरणांची सुनावणी पूर्ण झाली असून ती उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात अपीलाच्या टप्प्यात आहेत. त्यावर न्यायालयाने सांगितले की, नरोडा गाव प्रकरणाची सुनावणी कायद्यानुसार सुरू राहील. सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेली एसआयटी कायद्यानुसार या प्रकरणात आवश्यक पावले उचलू शकते. 

टॅग्स :GujaratगुजरातSupreme Courtसर्वोच्च न्यायालय