शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

राहुल गांधींना हायकोर्टाकडून अंतरिम दिलासा नाही; याचिकेवरील निर्णय राखून ठेवला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 18:44 IST

Rahul Gandhi Defamation Case: मोदी आडनाव मानहानी प्रकरणी राहुल गांधींना कोणत्याही प्रकारचा अंतरिम दिलासा देण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे.

Rahul Gandhi Defamation Case: काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोदी आडनाव अवमान प्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा दिलेला नाही. सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राहुल गांधी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यापूर्वी झालेल्या सुनावणीत राहुल गांधी यांच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांनी जोरदार युक्तिवाद केला होता. यानंतर, मंगळवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर यासंदर्भातील निर्णय राखून ठेवला आहे. न्यायालयाच्या उन्हाळी सुट्ट्यांनंतर या याचिकेवरील पुढील सुनावणी घेण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. 

मोदी आडनाव प्रकरणात दाखल मानहानीच्या खटल्यात दोषी ठरविण्यास स्थगिती मागण्यात आली होती. या प्रकरणी राहुल गांधी यांना सुरत येथील न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयानंतर राहुल गांधी यांना लोकसभेचे सदस्यत्वही गमवावे लागले होते. लोकसभेचे सदस्यत्व रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांना सरकारी निवासस्थान रिकामे करावे लागले होते. मोदी आडनाव प्रकरणात दाखल मानहानीच्या खटल्यात दोषी ठरविण्यास स्थगिती मागण्यात आली होती. या प्रकरणी राहुल गांधी यांना सुरत येथील न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. 

तुमचा हेतू काहीतरी वेगळा होता ते मान्य करा

याचिकाकर्ता वकिलांनी न्यायालयात सांगितले की, राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, त्यांना शिक्षा, तुरुंगवास याची भीती वाटत नाही. आयुष्यभरासाठी अपात्र ठरवले तरी ते मागे हटणार नाही. सार्वजनिक जीवनात राहुल गांधींनी अशी भूमिका जाहीर केली असली तरी, न्यायालयासमोरची भूमिका वेगळी यापेक्षा अतिशय भिन्न आहे. अशा दोन वेगळ्या भूमिका घेऊन न्यायालयासमोर तुम्ही येऊ नये. एकतर सार्वजनिकरित्या जाहीर केलेल्या भूमिकेशी ठाम राहा किंवा तुमचा हेतू काहीतरी वेगळा होता ते मान्य करा, असा युक्तिवाद करण्यात आला. 

राहुल गांधींच्या बाजूने काय युक्तिवाद करण्यात आला?

राहुल गांधी यांच्यावतीने बाजू मांडताना ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितले की, ज्या कथित गुन्ह्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोषी ठरवण्यात आले आहे आणि त्यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे, तो गंभीर नाही आणि त्यात नैतिक गैरवर्तनाचाही समावेश नाही. बदनामी हा येथे अक्षम्य गुन्हा मानला जात आहे. यामुळे निवडून आलेली व्यक्ती लोकप्रतिनिधी होण्याचा अधिकार गमावते. राहुल गांधींना पुढील सत्र, सभा इत्यादींमध्ये भाग घेता येणार नाही. याचदरम्यान, निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक घेतल्यास राहुल गांधी निवडणूक लढवू शकत नाही, दुसरा कोणी लढून जिंकू शकेल, मात्र, त्याला पराभूत करता येऊ शकणार नाही. पण या पोटनिवडणुकीतनंतर निर्दोष सिद्ध झालो तर काय, अशी विचारणा करत यामुळे सरकारी तिजोरीचेही नुकसान होणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, अभिषेक मनु सिंघवी यांनी राहुल गांधी यांना संरक्षण देत अंतरिम दिलासा द्यावा, अशी विनंती न्यायालयाला केली. मात्र, उच्च न्यायालयाने दोषी ठरविण्यास स्थगिती देण्याच्या मागणीवर अंतरिम दिलासा देण्यास स्पष्टपणे नकार दिला. तसेच या याचिकेवरील अंतिम निर्णय राखून ठेवला. या याचिकेवर आता उन्हाळी सुट्ट्या संपल्यावर निर्णय देण्यात येईल, असे न्यायालयाने सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीGujaratगुजरातHigh Courtउच्च न्यायालयcongressकाँग्रेस