शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

राहुल गांधींना हायकोर्टाकडून अंतरिम दिलासा नाही; याचिकेवरील निर्णय राखून ठेवला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 18:44 IST

Rahul Gandhi Defamation Case: मोदी आडनाव मानहानी प्रकरणी राहुल गांधींना कोणत्याही प्रकारचा अंतरिम दिलासा देण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे.

Rahul Gandhi Defamation Case: काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोदी आडनाव अवमान प्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा दिलेला नाही. सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राहुल गांधी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यापूर्वी झालेल्या सुनावणीत राहुल गांधी यांच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांनी जोरदार युक्तिवाद केला होता. यानंतर, मंगळवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर यासंदर्भातील निर्णय राखून ठेवला आहे. न्यायालयाच्या उन्हाळी सुट्ट्यांनंतर या याचिकेवरील पुढील सुनावणी घेण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. 

मोदी आडनाव प्रकरणात दाखल मानहानीच्या खटल्यात दोषी ठरविण्यास स्थगिती मागण्यात आली होती. या प्रकरणी राहुल गांधी यांना सुरत येथील न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयानंतर राहुल गांधी यांना लोकसभेचे सदस्यत्वही गमवावे लागले होते. लोकसभेचे सदस्यत्व रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांना सरकारी निवासस्थान रिकामे करावे लागले होते. मोदी आडनाव प्रकरणात दाखल मानहानीच्या खटल्यात दोषी ठरविण्यास स्थगिती मागण्यात आली होती. या प्रकरणी राहुल गांधी यांना सुरत येथील न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. 

तुमचा हेतू काहीतरी वेगळा होता ते मान्य करा

याचिकाकर्ता वकिलांनी न्यायालयात सांगितले की, राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, त्यांना शिक्षा, तुरुंगवास याची भीती वाटत नाही. आयुष्यभरासाठी अपात्र ठरवले तरी ते मागे हटणार नाही. सार्वजनिक जीवनात राहुल गांधींनी अशी भूमिका जाहीर केली असली तरी, न्यायालयासमोरची भूमिका वेगळी यापेक्षा अतिशय भिन्न आहे. अशा दोन वेगळ्या भूमिका घेऊन न्यायालयासमोर तुम्ही येऊ नये. एकतर सार्वजनिकरित्या जाहीर केलेल्या भूमिकेशी ठाम राहा किंवा तुमचा हेतू काहीतरी वेगळा होता ते मान्य करा, असा युक्तिवाद करण्यात आला. 

राहुल गांधींच्या बाजूने काय युक्तिवाद करण्यात आला?

राहुल गांधी यांच्यावतीने बाजू मांडताना ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितले की, ज्या कथित गुन्ह्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोषी ठरवण्यात आले आहे आणि त्यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे, तो गंभीर नाही आणि त्यात नैतिक गैरवर्तनाचाही समावेश नाही. बदनामी हा येथे अक्षम्य गुन्हा मानला जात आहे. यामुळे निवडून आलेली व्यक्ती लोकप्रतिनिधी होण्याचा अधिकार गमावते. राहुल गांधींना पुढील सत्र, सभा इत्यादींमध्ये भाग घेता येणार नाही. याचदरम्यान, निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक घेतल्यास राहुल गांधी निवडणूक लढवू शकत नाही, दुसरा कोणी लढून जिंकू शकेल, मात्र, त्याला पराभूत करता येऊ शकणार नाही. पण या पोटनिवडणुकीतनंतर निर्दोष सिद्ध झालो तर काय, अशी विचारणा करत यामुळे सरकारी तिजोरीचेही नुकसान होणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, अभिषेक मनु सिंघवी यांनी राहुल गांधी यांना संरक्षण देत अंतरिम दिलासा द्यावा, अशी विनंती न्यायालयाला केली. मात्र, उच्च न्यायालयाने दोषी ठरविण्यास स्थगिती देण्याच्या मागणीवर अंतरिम दिलासा देण्यास स्पष्टपणे नकार दिला. तसेच या याचिकेवरील अंतिम निर्णय राखून ठेवला. या याचिकेवर आता उन्हाळी सुट्ट्या संपल्यावर निर्णय देण्यात येईल, असे न्यायालयाने सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीGujaratगुजरातHigh Courtउच्च न्यायालयcongressकाँग्रेस