शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

राहुल गांधींना हायकोर्टाकडून अंतरिम दिलासा नाही; याचिकेवरील निर्णय राखून ठेवला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 18:44 IST

Rahul Gandhi Defamation Case: मोदी आडनाव मानहानी प्रकरणी राहुल गांधींना कोणत्याही प्रकारचा अंतरिम दिलासा देण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे.

Rahul Gandhi Defamation Case: काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोदी आडनाव अवमान प्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा दिलेला नाही. सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राहुल गांधी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यापूर्वी झालेल्या सुनावणीत राहुल गांधी यांच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांनी जोरदार युक्तिवाद केला होता. यानंतर, मंगळवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर यासंदर्भातील निर्णय राखून ठेवला आहे. न्यायालयाच्या उन्हाळी सुट्ट्यांनंतर या याचिकेवरील पुढील सुनावणी घेण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. 

मोदी आडनाव प्रकरणात दाखल मानहानीच्या खटल्यात दोषी ठरविण्यास स्थगिती मागण्यात आली होती. या प्रकरणी राहुल गांधी यांना सुरत येथील न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयानंतर राहुल गांधी यांना लोकसभेचे सदस्यत्वही गमवावे लागले होते. लोकसभेचे सदस्यत्व रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांना सरकारी निवासस्थान रिकामे करावे लागले होते. मोदी आडनाव प्रकरणात दाखल मानहानीच्या खटल्यात दोषी ठरविण्यास स्थगिती मागण्यात आली होती. या प्रकरणी राहुल गांधी यांना सुरत येथील न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. 

तुमचा हेतू काहीतरी वेगळा होता ते मान्य करा

याचिकाकर्ता वकिलांनी न्यायालयात सांगितले की, राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, त्यांना शिक्षा, तुरुंगवास याची भीती वाटत नाही. आयुष्यभरासाठी अपात्र ठरवले तरी ते मागे हटणार नाही. सार्वजनिक जीवनात राहुल गांधींनी अशी भूमिका जाहीर केली असली तरी, न्यायालयासमोरची भूमिका वेगळी यापेक्षा अतिशय भिन्न आहे. अशा दोन वेगळ्या भूमिका घेऊन न्यायालयासमोर तुम्ही येऊ नये. एकतर सार्वजनिकरित्या जाहीर केलेल्या भूमिकेशी ठाम राहा किंवा तुमचा हेतू काहीतरी वेगळा होता ते मान्य करा, असा युक्तिवाद करण्यात आला. 

राहुल गांधींच्या बाजूने काय युक्तिवाद करण्यात आला?

राहुल गांधी यांच्यावतीने बाजू मांडताना ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितले की, ज्या कथित गुन्ह्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोषी ठरवण्यात आले आहे आणि त्यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे, तो गंभीर नाही आणि त्यात नैतिक गैरवर्तनाचाही समावेश नाही. बदनामी हा येथे अक्षम्य गुन्हा मानला जात आहे. यामुळे निवडून आलेली व्यक्ती लोकप्रतिनिधी होण्याचा अधिकार गमावते. राहुल गांधींना पुढील सत्र, सभा इत्यादींमध्ये भाग घेता येणार नाही. याचदरम्यान, निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक घेतल्यास राहुल गांधी निवडणूक लढवू शकत नाही, दुसरा कोणी लढून जिंकू शकेल, मात्र, त्याला पराभूत करता येऊ शकणार नाही. पण या पोटनिवडणुकीतनंतर निर्दोष सिद्ध झालो तर काय, अशी विचारणा करत यामुळे सरकारी तिजोरीचेही नुकसान होणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, अभिषेक मनु सिंघवी यांनी राहुल गांधी यांना संरक्षण देत अंतरिम दिलासा द्यावा, अशी विनंती न्यायालयाला केली. मात्र, उच्च न्यायालयाने दोषी ठरविण्यास स्थगिती देण्याच्या मागणीवर अंतरिम दिलासा देण्यास स्पष्टपणे नकार दिला. तसेच या याचिकेवरील अंतिम निर्णय राखून ठेवला. या याचिकेवर आता उन्हाळी सुट्ट्या संपल्यावर निर्णय देण्यात येईल, असे न्यायालयाने सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीGujaratगुजरातHigh Courtउच्च न्यायालयcongressकाँग्रेस