शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Gujarat Election 2022 : काँग्रेस दहशतवादाला व्होट बँकेच्या चष्म्यातून पाहते, पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2022 22:47 IST

Gujarat Election 2022 : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार आता अखेरच्या टप्प्यात आला आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार आता अखेरच्या टप्प्यात आला आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील खेडा येथे  जनतेला संबोधित केलं. यावेळी देशात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांवरून त्यांनी काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला. “गुजरात आणि देशात काँग्रेस आणि समविचारी पक्षांपासून सावध राहण्याची गरज आहे, जे आपली व्होट बँक सुरक्षित ठेवण्यासाठी मोठ्या दहशतवादी हल्ल्यांवरही शांत राहतात,” असं मोदी यावेळी म्हणाले. काँग्रेस आणि त्यांचे समविचारी अनेक पक्ष यश मिळवण्यासाठी दहशतवादाला शॉर्टकट समजत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

“दहशतवाद आता संपला नाही आणि काँग्रेसचं राजकारणही बदललं नाही. काँग्रेस दहशतवादाला व्होट बँकेच्या चष्म्यातून पाहते. ना केवळ काँग्रेस, शिवाय त्यांचे समविचारी पक्ष हे दहशतवादाला यशाच्या शॉर्टकटच्या रुपात पाहतात आणि छोट्या पक्षांची सत्तेची भूक आणखी मोठी आहे,” असं मोदी यावेळी म्हणाले. परंतु त्यांनी कोणत्याही पक्षाचं नाव या ठिकाणी घेतलं नाही.

जेव्हा मोठे दहशतवादी हल्ले होतात तेव्हा या पक्षांचं तोंड बंद असतं, जेणेकरून त्यांची व्होटबँक नाराज होऊ नये. दहशतवाद्यांना वाचवण्यासाठी ते मागच्या दाराने न्यायालयातही जात असल्याचे ते त्यांनी नमूद केले. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचं मतदान १ डिसेंबर रोजी आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान ५ डिसेंबर रोजी होणार आहे.

"दहशतवाद्यांच्या समर्थनार्थ काँग्रेस नेता रडला"“जेव्हा बटला हाऊस एन्काऊंटर झालं तेव्हा काँग्रेसचा एक नेता दहशतवाद्यांच्या समर्थनार्थ रडू लागला होता. गुजरात आणि देशानं अशा पक्षांपासून सतर्क राहिलं पाहिजे. २०१४ मध्ये तुमच्या एका मतानं दहशतवादाविरोधातली लढाई अधिक मजबूत केली. आता तुमच्या शहरांमध्ये दहशतवादी हल्ले विसरून जा. आता सीमेवरही असे हल्ले करण्यापूर्वी आपले शत्रू १०० वेळा विचार करतात,” असे मोदी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022