शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

राज्यसभा निवडणुकीपूर्वी गुजरात काँग्रेसला झटका; काही आमदार संपर्काच्या बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2020 15:04 IST

काँग्रेस 7 आमदारांशी अद्याप संपर्क साधू शकलेली नाही. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं गुजरातमध्ये सावध पावलं उचलण्यास आतापासूनच सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देगुजरातमधल्या राज्यसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या अडचणीत वाढ झाली आहे. राज्यसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसचे दोन आमदार गायब झाले आहेत. आमदार जे. वी. काकडिया आणि सोमाभाई पटेल हे आमदार काँग्रेसच्या संपर्कात नाहीत. खरं तर ते आमदार भाजपाला समर्थन देणार असल्याची चर्चा आहे. तसेच काँग्रेसचा आणखी एक आमदार मंगल गावित यांच्याशीही संपर्क साधू शकलेले नाही.

नवी दिल्लीः गुजरातमधल्याराज्यसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या अडचणीत वाढ झाली आहे. राज्यसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसचे दोन आमदार गायब झाले आहेत. आमदार जे. वी. काकडिया आणि सोमाभाई पटेल हे आमदार काँग्रेसच्या संपर्कात नाहीत. खरं तर ते आमदार भाजपाला समर्थन देणार असल्याची चर्चा आहे. तसेच काँग्रेसचा आणखी एक आमदार मंगल गावित यांच्याशीही संपर्क साधू शकलेले नाही. ते आमदार राजीनामेसुद्धा देऊ शकतात, अशीही अटकळ बांधली जात आहे. काँग्रेसकडे 73 आमदार आहे. काँग्रेस 7 आमदारांशी अद्याप संपर्क साधू शकलेली नाही. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं गुजरातमध्ये सावध पावलं उचलण्यास आतापासूनच सुरुवात केली आहे. शनिवारी काँग्रेसनं आपले 14 आमदार जयपूरमध्ये हलवले होते. गुजरातमधले हे आमदार जयपूरच्या पाच सितारा हॉटेल शिव विलासमध्ये थांबले आहेत. या सर्व आमदारांना राजस्थान सरकारमधले महेश जोशी आणि महेंद्र चौधरी बस घेऊन शिव विलास हॉटेलमध्ये घेऊन गेले. गुजरातमध्ये राज्यसभेच्या चार जागांसाठी 26 मार्चला मतदान होणार आहे. राज्यसभा निवडणुकीच्या नामांकनाच्या शेवटच्या दिवशी भाजपाच्या आणखी तीन उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. अभय भारद्वाज आणि रमिला बेन बाराबरोबर तिसऱ्या उमेदवाराच्या स्वरूपात नरहरी अमीननं नामांकन अर्ज दाखल केलं आहे. काँग्रेसकडून शक्ती सिंह गोहिल आणि भरत सिंह सोलंकी यांनी नामांकन अर्ज भरलं आहे. भाजपा आणि काँग्रेस दोघांनीही आपापल्या विजयाचा दावा केला आहे. मध्य प्रदेशातील राजकीय उलथापलाथीनंतर या निवडणुकीत काँग्रेसच्या आमदारांकडून भाजपाच्या उमेदवाराला क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता आहे. यामुळे सावधगिरी म्हणून काँग्रेसने आपल्या आमदारांना जयपूरला हलवले आहे. यासंदर्भात बोलताना काँग्रेसचे आमदार हिंमत सिंह पटेल यांनी, 'आमच्या पक्षात सर्वकाही ठीक आहे. प्रत्येक पक्षाची रणनीती असते. त्यामुळे हा एक रणनीतीचा भाग आहे, असे म्हटले आहे. महाराष्ट्रात सत्ता संघर्ष सुरू असतानाही काँग्रेसने आपल्या आमदारांना जयपूरमधेच ठेवले होते. गुजरातमधील चार राज्‍यसभा जागांसाठी 26 मार्चला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपाने अभय भारद्वाज, रमीराबेल बारा आणि नरहरी अमीन यांना रिंगणात उतरवले आहे. अमीन यांनी २०१२ मध्ये काँग्रेसला रामराम ठोकत भाजपामध्ये प्रवेश केला होता. यामुळे या निवडणुकीत काँग्रेसच्या काही आमदारांकडून त्यांना क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाGujaratगुजरातcongressकाँग्रेस