शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

अल-कायदा दहशतवादी मॉड्यूलची मास्टरमाइंड सापडली; समा परवीनला अटक, इन्स्टाग्रामवरुन रचला होता मोठा कट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 11:16 IST

अल कायदा दहशतवादी मॉड्यूल प्रकरणात गुजरात एटीएसने मॉड्यूलच्या मास्टरमाइंडला अटक केली आहे.

Gujarat ATS: ऑपरेशन सिंदूरनंतर देशातील सर्व सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. देशातील विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या दहशतवादी संघटनांशी संबंधित असलेल्यांवर सुरक्षा यंत्रणांकडून नजर ठेवली जात आहे. गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने गेल्या आठवड्यात तीन दहशतवाद्यांना अटक केली होती. त्यांनी गुजरात एटीएसला आणखी एक मोठे यश मिळाले आहे. गुजरात एटीएसने बंगळुरू येथून एका महिलेला अटक केली आहे, जिचा अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे समोर आलं आहे.

गुजरात एटीएसने अल कायदाशी संबंधित असलेल्या ३० वर्षीय समा परवीन या महिलेलाला बंगळुरू येथून अटक केली. एटीएसने काही दिवसांपूर्वी नोएडा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि गुजरात येथून तीन दहशतवाद्यांना अटक केली होती. आता त्यांच्याशी संबंधित समा परवीनला अटक करण्यात आली. समा परवीनची अटक हे मोठे यश असल्याचे एटीएसने म्हटलं आहे. गुजरात एटीएसचे डीआयजी सुनील जोशी यांनी सांगितले की, अल कायदाशी संबंधित असलेल्या बंगळुरू येथील समा परवीन नावाच्या महिलेला अटक करण्यात आली आहे. गुजरात एटीएस दुपारी १२ वाजता शमा परवीनच्या अटकेबाबत पत्रकार परिषद घेणार आहे.

या कारवाईबाबत गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनीही प्रतिक्रिया दिली. "गुजरात एटीएसने यापूर्वी ४ एक्यूआयएस दहशतवाद्यांना अटक केली होती. काल, बंगळुरू येथील एका महिलेला अटक करण्यात आली. ती अत्यंत कट्टरपंथी आहे आणि ऑनलाइन दहशतवादी मॉड्यूल चालवत होती. तिच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून महत्त्वाचे पाकिस्तानी फोन नंबर जप्त करण्यात आले आहेत. गुजरात एटीएसने ऑनलाइन दहशतवादी मॉड्यूल चालवणाऱ्या ५ एक्यूआयएस दहशतवाद्यांना अटक केली आहे," असं हर्ष संघवी म्हणाले.

अल-कायदाच्या भारतातील युनिटशी संबंधित एका मोठ्या सोशल मीडिया मॉड्यूलचा पर्दाफाश करताना एटीएसने चार आरोपींना अटक केली होती. गुजरातमधून दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली तर आणखी दोघांना नोएडा आणि दिल्लीतून ताब्यात घेतलं होतं. गुजरात एटीएसने वेळीच एका मोठ्या दहशतवादी कटाचा पर्दाफाश केला आहे. अटक केलेले सर्व दहशतवादी इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे 'गजवा-ए-हिंद'च्या विचारसरणीच्या नावाखाली भारतात हिंसाचार पसरवण्याचा कट रचत होते. बंगळुरुतून अटक करण्यातआलेली समा परवीन ही या मॉड्यूलची मास्टरमाइंड असल्याचे समोर आलं.

काही इंस्टाग्राम अकाउंट्सद्वारे देशविरोधी आणि चिथावणीखोर गोष्टी पसरवल्या जात असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. या अकाउंट्समधून दहशतवादी सामग्री, व्हिडिओ आणि एक्यूआयएसची विचारसरणी शेअर केली जात होती. ज्याचा उद्देश देशातील मुस्लिम तरुणांना भडकवणे, त्यांना दहशतवादाच्या मार्गावर नेणे आणि भारत सरकार आणि लोकशाही संस्थांविरुद्ध हिंसाचाराला प्रोत्साहन देणे हा होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGujaratगुजरातterroristदहशतवादी