शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

बापरे! काँग्रेस नेत्याच्या मुलाच्या लग्नात जेवणं पडलं महागात, तब्बल 1200 जण आजारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 20:39 IST

लग्न समारंभात जेवण झाल्यानंतर 1200 हून अधिक लोक आजारी पडले आणि त्या सर्वांना रुग्णालयात दाखल करावं लागलं.

नवी दिल्ली - गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यात काँग्रेसच्या एका स्थानिक नेत्याच्या मुलाच्या लग्नात जेवल्यानंतर 1200 हून अधिक लोक आजारी पडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सर्वांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, विसनगर ग्रामीण पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा विसनगर तालुक्यातील सावला गावात घडली आहे.

मेहसाणा पोलीस अधीक्षक पार्थराज सिंग गोहिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्न समारंभात जेवण झाल्यानंतर 1200 हून अधिक लोक आजारी पडले आणि त्या सर्वांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. पोलीस अधीक्षकांनी जेवण झाल्यानंतर लोकांना उलटी आणि जुलाबचा त्रास सुरू झाला. ज्यानंतर विसनगर, मेहसाणा आणि वडनगरमधील विविध रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं असल्याचं म्हटलं आहे.

अधिकाऱ्यांनी लग्न समारंभात दिलेल्या जेवणाचे नमुने फॉरेन्सिक आणि अन्न व औषध प्रशासनाकडून तपासासाठी एकत्र करण्यात आले आहेत असं सांगितलं. विसनगर ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावला गावात काँग्रेसच्या एका स्थानिक नेत्याच्या मुलाचं लग्न होतं. यात मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. पोलीस या प्रकरणात तपास करीत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसGujaratगुजरात