शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

लाेकसभेच्या हॅट्ट्रिकची गॅरंटी, PM नरेंद्र मोदींचा विश्वास; भाजप मुख्यालयात जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 07:34 IST

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांकडे आगामी लोकसभा निवडणुकांची सेमीफायनल म्हणून पाहिले गेले

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या उत्कृष्ट कामगिरीचे ऐतिहासिक आणि अभूतपूर्व असे वर्णन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, हा आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाचा विजय आहे. तसेच, राज्यांमधील हॅटट्रिक ही २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत जिंकण्याची हॅटट्रिकची गॅरंटी आहे, असेही ते म्हणाले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, मतदारांनी भ्रष्टाचारात गुंतलेल्या या पक्षांना त्यांचे मार्ग सुधारण्याचा इशारा दिला आहे अन्यथा लोक त्यांना संपवतील. चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या बाजूने निकाल आल्यानंतर पंतप्रधान मोदी भाजपच्या मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. तत्पूर्वी, ते पक्षाच्या मुख्यालयात पोहोचल्यानंतर कार्यकर्त्यांनी पुष्पवृष्टी करून त्यांचे भव्य स्वागत केले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते.

केवळ घराणेशाहीतील नेत्यांचा एकत्रित फोटो लोकांचा विश्वास जिंकू शकत नाही

विजय ऐतिहासिक, अभूतपूर्व आहे. आज सबका साथ, सबका विकास ही भावना जिंकली आहे. हा निकाल भ्रष्टाचाराच्या विरोधातील आमच्या लढाईला लोकांचा पाठिंबा दर्शवतो. इंडिया आघाडीला धडा मिळाला आहे की, केवळ घराणेशाहीतील काही नेत्यांना व्यासपीठावर एकत्रित केल्याने चांगला फोटो मिळेल. परंतु, लोकांचा विश्वास जिंकू शकत नाहीत. केंद्राचा विकास आणि लोकांमध्ये कोणीही येऊ नये, अन्यथा जनता त्यांना दूर करेल. लोक आधीच म्हणत आहेत की, राज्यांमध्ये आमची हॅटट्रिक ही लोकसभेतील विजयाची हमी आहे. 

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांकडे आगामी लोकसभा निवडणुकांची सेमीफायनल म्हणून पाहिले गेले. त्या निवडणुकांत भाजपने नेत्रदीपक यश मिळविले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच हा विजय मिळाला, अशी प्रतिक्रिया भाजपमधील दिग्गज नेत्यांनी व्यक्त केली आहे. पाच राज्यांपैकी चार राज्यांची रविवारी मतमोजणी झाली तर मिझोराममध्ये उद्या, सोमवारी मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहेत. 

महिला, तरुण, गरीब अन् शेतकऱ्यांचे सक्षमीकरण मोदी म्हणाले की, विकसित भारताच्या आमच्या अजेंड्याला लोक अधिकाधिक पाठिंबा देत आहेत. भक्कम बहुमत असलेल्या स्थिर सरकारला लोक मतदान करत आहेत हे जग पाहत आहे. स्वार्थी राजकारण आणि राष्ट्रहिताचे राजकारण यातील फरक लोक जाणू शकतात. मजबूत भाजप देशाचा आणि प्रत्येक कुटुंबाचा विकास घडवून आणतो हे त्यांच्या लक्षात आले आहे. महिला, तरुण, गरीब आणि शेतकरी या चार मोठ्या जाती असून त्यांच्या सक्षमीकरणामुळे देशाचे सक्षमीकरण होईल, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

मी तुम्हाला पूर्ण प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की, तुमची स्वप्ने हा माझा संकल्प आहे. देशाच्या पायाभूत सुविधांमध्ये बदल होत आहे आणि देशाची अर्थव्यवस्था जगातील सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. - नरेंद्र माेदी, पंतप्रधान

मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानातील जनादेश मी नम्रपणे स्वीकारतो. तथापि, विचारसरणीची लढाई सुरू ठेवू. तेलंगणातील जनतेचा मी खूप आभारी आहे. आम्ही निश्चितपणे तेलंगणाला लोकांचे सरकार देण्याचे वचन पूर्ण करू. सर्व कार्यकर्त्यांचे मेहनत व पाठिंब्याबद्दल खूप खूप आभार. - राहुल गांधी, काॅंग्रेस नेते

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीElectionनिवडणूकMadhya Pradesh Assembly Electionमध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूक