शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

लाेकसभेच्या हॅट्ट्रिकची गॅरंटी, PM नरेंद्र मोदींचा विश्वास; भाजप मुख्यालयात जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 07:34 IST

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांकडे आगामी लोकसभा निवडणुकांची सेमीफायनल म्हणून पाहिले गेले

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या उत्कृष्ट कामगिरीचे ऐतिहासिक आणि अभूतपूर्व असे वर्णन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, हा आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाचा विजय आहे. तसेच, राज्यांमधील हॅटट्रिक ही २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत जिंकण्याची हॅटट्रिकची गॅरंटी आहे, असेही ते म्हणाले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, मतदारांनी भ्रष्टाचारात गुंतलेल्या या पक्षांना त्यांचे मार्ग सुधारण्याचा इशारा दिला आहे अन्यथा लोक त्यांना संपवतील. चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या बाजूने निकाल आल्यानंतर पंतप्रधान मोदी भाजपच्या मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. तत्पूर्वी, ते पक्षाच्या मुख्यालयात पोहोचल्यानंतर कार्यकर्त्यांनी पुष्पवृष्टी करून त्यांचे भव्य स्वागत केले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते.

केवळ घराणेशाहीतील नेत्यांचा एकत्रित फोटो लोकांचा विश्वास जिंकू शकत नाही

विजय ऐतिहासिक, अभूतपूर्व आहे. आज सबका साथ, सबका विकास ही भावना जिंकली आहे. हा निकाल भ्रष्टाचाराच्या विरोधातील आमच्या लढाईला लोकांचा पाठिंबा दर्शवतो. इंडिया आघाडीला धडा मिळाला आहे की, केवळ घराणेशाहीतील काही नेत्यांना व्यासपीठावर एकत्रित केल्याने चांगला फोटो मिळेल. परंतु, लोकांचा विश्वास जिंकू शकत नाहीत. केंद्राचा विकास आणि लोकांमध्ये कोणीही येऊ नये, अन्यथा जनता त्यांना दूर करेल. लोक आधीच म्हणत आहेत की, राज्यांमध्ये आमची हॅटट्रिक ही लोकसभेतील विजयाची हमी आहे. 

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांकडे आगामी लोकसभा निवडणुकांची सेमीफायनल म्हणून पाहिले गेले. त्या निवडणुकांत भाजपने नेत्रदीपक यश मिळविले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच हा विजय मिळाला, अशी प्रतिक्रिया भाजपमधील दिग्गज नेत्यांनी व्यक्त केली आहे. पाच राज्यांपैकी चार राज्यांची रविवारी मतमोजणी झाली तर मिझोराममध्ये उद्या, सोमवारी मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहेत. 

महिला, तरुण, गरीब अन् शेतकऱ्यांचे सक्षमीकरण मोदी म्हणाले की, विकसित भारताच्या आमच्या अजेंड्याला लोक अधिकाधिक पाठिंबा देत आहेत. भक्कम बहुमत असलेल्या स्थिर सरकारला लोक मतदान करत आहेत हे जग पाहत आहे. स्वार्थी राजकारण आणि राष्ट्रहिताचे राजकारण यातील फरक लोक जाणू शकतात. मजबूत भाजप देशाचा आणि प्रत्येक कुटुंबाचा विकास घडवून आणतो हे त्यांच्या लक्षात आले आहे. महिला, तरुण, गरीब आणि शेतकरी या चार मोठ्या जाती असून त्यांच्या सक्षमीकरणामुळे देशाचे सक्षमीकरण होईल, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

मी तुम्हाला पूर्ण प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की, तुमची स्वप्ने हा माझा संकल्प आहे. देशाच्या पायाभूत सुविधांमध्ये बदल होत आहे आणि देशाची अर्थव्यवस्था जगातील सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. - नरेंद्र माेदी, पंतप्रधान

मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानातील जनादेश मी नम्रपणे स्वीकारतो. तथापि, विचारसरणीची लढाई सुरू ठेवू. तेलंगणातील जनतेचा मी खूप आभारी आहे. आम्ही निश्चितपणे तेलंगणाला लोकांचे सरकार देण्याचे वचन पूर्ण करू. सर्व कार्यकर्त्यांचे मेहनत व पाठिंब्याबद्दल खूप खूप आभार. - राहुल गांधी, काॅंग्रेस नेते

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीElectionनिवडणूकMadhya Pradesh Assembly Electionमध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूक