शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

CBSEच्या पेपर फुटीबद्दल सोशल मीडियात वाढता संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2018 22:45 IST

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा(सीबीएसई)चे पेपर फुटल्यानं पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये फारच गोंधळ उडाला आहे.  दहावीचा गणित आणि बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर फुटल्यानं या विषयांच्या परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहेत.

नवी दिल्ली- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा(सीबीएसई)चे पेपर फुटल्यानं पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये फारच गोंधळ उडाला आहे. दहावीचा गणित आणि बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर फुटल्यानं या विषयांच्या परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमधून आता संताप व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावर विद्यार्थ्यांनी या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा(सीबीएसई)वर टीकेची झोड उठवली आहे.मी दहावीचा गणिताचा पेपर देऊन घरी परतलो आणि पेपर फुटल्याची बातमी ऐकून मला धक्काच बसला. त्यामुळे मला आता पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे. शिक्षण मंडळाचे अधिकारी काय करत असतात, असा प्रश्न एका विद्यार्थ्यानं उपस्थित केला आहे.तर दुस-या एका विद्यार्थिनीनं म्हटलंय की, सीबीएसईचे पेपर फुटल्यानं आम्हाला आता पुन्हा अभ्यास करून परीक्षा द्यावी लागणार आहे. हे फारच हास्यास्पद आहे. मी पूर्ण वर्षभर प्रामाणिकपणे अभ्यास केेला होता. पेपर फुटला त्यात माझा गुन्हा काय? मला आता असा वाटत आहे की एवढा अभ्यास करूनही पहिली परीक्षा दिल्यावर पहिले जेवढे मार्क्स मिळणार होतेे, त्यापेेक्षा पुन्हा परीक्षा दिल्यावर कमी मिळतील. खूप वाईट वाटत आहे आणि पुन्हा परीक्षा द्यावी लागणार या कल्पनेने संताप होतोय, असंही आरुष मांजरेेेकर या विद्यार्थ्यानं प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. माजी केंद्रीय मंत्री अजय माकन यांनी या पेपरफुटीवरून भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे. माझ्या मुलालाही केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या गोंधळाचा मनस्ताप सहन करावा लागला आहे. तर ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ प्रशांत भूषण यांनीही भाजपा सरकारला लक्ष्य केलं आहे. सीबीएसईचे पेपर व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून फुटतायत. त्यामुळे भारतात होणा-या परीक्षा तरी गैर प्रकारांपासून सुरक्षित आहेत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे नमो अॅपद्वारे आपली खासगी माहिती अमेरिकेत पोहोचत आहे, तरीही मोदी सरकार आधारची माहिती सुरक्षित असल्याचा दावा करणं हे हास्यास्पद आहे.

टॅग्स :CBSE Paper Leak 2018सीबीएसई पेपरफुटी प्रकरणCBSE Examसीबीएसई परीक्षा