शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नवरदेवानं 'तिलक'चे ११ लाख रुपये केले परत, सासऱ्यांच्या डोळ्यांत पाणी; कडकडून मिठी मारली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 16:46 IST

लग्नसोहळ्यांमध्ये नवरदेवाला 'तिलक' म्हणून लाखो रुपयांची बरसात करण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे.

जयपूर-

राजस्थानमध्ये आता विवाह सोहळ्यांमधील प्रथा-परंपरांना छेद देत सामाजिक भान जपण्याच्या दृष्टीनं मोठा बदल घडताना पाहायला मिळत आहे. लग्नसोहळ्यांमध्ये नवरदेवाला 'तिलक' म्हणून लाखो रुपयांची बरसात करण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. यात मुलीच्या वडीलांची संपूर्ण आयुष्याची पुंजी लग्नात हुंडा म्हणून खर्च होते. पण आता समाजात हुंडा घेणं किती चुकीचं आहे याबाबतची जनजागृती झाल्यानंतर याचं प्रमाण देखील कमी झालं आहे. तिलक स्वरुपात दिलेला ११ लाख रुपयांचा हुंडा नवरदेवानं वधूच्या वडीलांना परत करुन समाजासमोर आदर्श निर्माण केल्याची एक घटना समोर आली आहे. 

राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये एका लग्न सोहळ्यात वधूच्या पित्यानं नवरदेवाला हुंड्याच्या निमित्तानं ११ लाख रुपयांची रक्कम 'तिलक' म्हणून देऊ केली. पण नवरदेव आणि त्याच्या वडीलांनी संपूर्ण रक्कम वधूच्या वडीलांना परत केली. नवरदेव शैलेंद्र सिंह राठोड आणि त्याचे वडील विजय सिंह राठोड यांनी दाखवलेलं सामाजिक भान याचं परिसरात जोरदार कौतुक केलं जात आहे. राजस्थानमध्ये याआधी देखील अशी उदाहरणं समोर आली आहेत. 

मूळचे राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील किशनपुरा येथील रहिवासी असलेले विजय सिंह राठोड जयपूरमध्ये राहतात आणि मालमत्ता व्यवसायाशी निगडीत ते काम करतात. विजय सिंह यांची पत्नी समुन शेखावत शिक्षिका आहेत. तर मुलगा म्हणजेच नवरदेव शैलेंद्र सिंह जयपूरच्या विद्युत वितरण निगम लिमिटेडमध्ये अकाऊन्टंट पदावर कार्यरत आहे. शैलेंद्रचा ५ फेब्रुवारी रोजी जयपूरच्या जोधपुरा येथील रहिवासी सुरेंद्र सिंह शेखावत यांची मुलगी कंचन शेखावत हिच्यासोबत विवाह झाला. कंचन उच्चशिक्षित असून एमएससी व बीएडपर्यंतचं शिक्षण तिनं पूर्ण केलं आहे. तसंच नेट परीक्षा देखील उत्तीर्ण केली आहे. 

भावूक होऊन वधुच्या वडिलांनी व्याहींना मारली मिठीलग्नात वधूचे वडील सुरेंद्र सिंह शेखावत यांनी नवरदेव शैलेंद्र सिंह याला तिलक म्हणून ११ लाख रुपये रोकड देऊ केले. पण नवरदेव आणि त्याच्या वडीलांनी ते सन्मानानं परत केले. शैलेंद्र सिंह यांनी घेतलेल्या निर्णयाचं उपस्थितांनी कौतुक केलं. तर वधूचे वडील सुरेंद्र शेखावत यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी नवरदेवाच्या वडीलांना कडकडून मिठी मारली आणि आभार व्यक्त केले. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानdowryहुंडा