शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

बोंबला! लग्नाच्या दिवशी 'ती' नवरदेवाला पळवून घेऊन गेली, नवरी बिचारी वाट पाहत राहिली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2021 17:09 IST

लग्नाला काही तास उरले असताना नवरदेव अचानक गायब झाला होता. त्याचं कारण आता समोर आलं असून त्याच्या प्रेयसीने त्याला पळवून नेल्याची माहिती मिळत आहे.

नवी दिल्ली - प्रेमासाठी अनेक जण वाटेल ते करतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. लग्नाच्याच दिवशी प्रेयसी नवरदेवाला पळवून घेऊन गेली आणि नवरी बिचारी वाट पाहत राहिल्याची घटना समोर आली आहे, राजस्थानच्या झुंझुनू येथील मेदारामध्ये ही हैराण करणारी घटना घडली. नवरा पळून गेल्याचं समजताच सर्वांनाच मोठा धक्का बसला. त्याच्या कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. वधू पक्षाने नवरदेवाविरोधात पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाला काही तास उरले असताना नवरदेव अचानक गायब झाला होता. त्याचं कारण आता समोर आलं असून त्याच्या प्रेयसीने त्याला पळवून नेल्याची माहिती मिळत आहे. राजस्थानच्या झुंझुनू भागातील रवी कुमार नावाच्या तरुणाचं लग्न धींगडिया गावच्या कवितासोबत ठरलं होतं. लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती. काही वेळातच नवरदेवाला घेऊन वऱ्हाड येईल आणि थाटामाटात लग्न पार पडेल, या तयारीत वधूकडील मंडळी सज्ज होती. 

प्रेमासाठी काय पण! लग्नमंडपातून नवरदेव झाला गायब

रवीच्या घरीदेखील सर्व तयारी पूर्ण झाली होती. पाहुणेमंडळी जमली होती आणि काही वेळात ते लग्नासाठी निघणार होते. वऱ्हाड निघण्यापूर्वी काही वेळ नवरदेव रवी घरातून दुचाकी घेऊन बाहेर पडला. थोड्याच वेळात परत येतो, असं सांगून तो बाहेर गेला खरा, मात्र वऱ्हाड निघण्याची वेळ झाली तरी परतला नाही. काही वेळ घरच्यांनी आणि पाहुणेमंडळींनी त्याची वाट पाहिली. मात्र बराच वेळ उलटूनही तो न आल्यामुळे सर्वांना चिंता वाटू लागली. कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेत रवी हरवल्याची तक्रार दिली.

रवीचं त्याच्यात गावातील एका तरुणीवर प्रेम होतं. आपलं लग्न झालं, तर प्रेमकहाणी अपूर्ण राहिल, असं वाटून दोघांनी लग्न करण्याचा निर्णय़ घेतला आणि त्याच दिवशी पळून जाण्याचं ठरवलं. लग्नाला निघण्यापूर्वी काही तास अगोदर रवी घराबाहेर पडला आणि या तरुणीसोबत पळून गेला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या अजब लग्नाच्या गोष्टीची चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :marriageलग्न