शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

हृदयद्रावक! रिसेप्शनच्या दिवशीच नवरदेवाचा मृत्यू; 3 दिवसांपूर्वी झालेला प्रेमविवाह, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 09:51 IST

तरुणाचं 27 नोव्हेंबर म्हणजे अवघ्या तीन दिवसांपूर्वीच लग्न झालं होतं. रिसेप्शनच्या दिवशीच तरुणाचा मृत्य़ू झाला आहे.

बिहारमध्ये एक हृदयदावक घटना घडली आहे. सारण जिल्ह्यामध्ये मंगळवारी रात्री एका बाईकचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे अपघातात जीव गमावलेल्या तरुणाचं 27 नोव्हेंबर म्हणजे अवघ्या तीन दिवसांपूर्वीच लग्न झालं होतं. रिसेप्शनच्या दिवशीच तरुणाचा मृत्य़ू झाला आहे. रिसेप्शनचं सामान खरेदी करण्यासाठी बाईकवरून गेलेल्या तरुणाचा अपघात झाला. या घटनेने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पोखरेरा बगही गावामध्ये मंगळवारी रात्री हा भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या दोन बाईकची जोरदार धडक झाली. या अपघातात चार जण गंभीररित्या जखमी झाले. यावेळी घटनास्थळी असलेल्या लोकांनी जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. त्याचवेळी डॉक्टरांनी नवीन लग्न झालेल्या रोशन नावाच्या तरुणाला मृत घोषित केलं. 

डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर तीन गंभीर जखमींना आणखी चांगल्या उपचारासाठी पीएमसीएमयेथे रेफर केलं. तसेच जखमींपैकी एक असलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. बगही गावातील निवासी असलेल्या रोशनचं 27 नोव्हेंबरला लग्न झालं होतं. छत्तीसगडच्या रायपूरची रहिवासी असलेल्या पिंकीसोबत त्याची ओळख झाली. पुढे ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं आणि दोन्ही कुटुंबाच्या आशीर्वादाने लग्नही केलं. 

30 नोव्हेंबर रोजी पूजा आणि रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं होतं. रोशनसह सर्वजण कार्यक्रमाची जोरदार तयारी करत होते. घरामध्ये उत्साहाचं वातावरण होतं. मंगळवारी रोशन आपल्या आईसह बाईकवरून पुजा आणि रिसेप्शनचं काही सामान आणण्यासाठी गेला होता. त्याचवेळी भीषण अपघात झाला आणि रोशनने आपला जीव गमावला आहे. त्याची पत्नी पिंकी हिला या घटनेने मोठा धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"