शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

नोटा मोजता येईनात; नववधूने मंडपातच दिला नवरदेवाला डच्चू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 15:31 IST

लग्नसमारंभांमध्ये हुंडा मागितला म्हणून किंवा मद्यप्राशन करून धिंगाना घातला म्हणून लग्ग मंडपातून वधूने वरात मागे पाठविल्याच्या घटना घडल्या आहेत.

पंडौल : बिहारमधील मधुबनी जिल्ह्यातील पंडौल गावामध्ये एका नवरीने नवरदेव अशिक्षित असल्याच्या कारणावरून गळ्यात माळ पडलेली असतानाही धाडस दाखविले आहे. 100 च्या नोटा चक्क तीनवेळा प्रयत्न करूनही नीट मोजता न आल्याने तिने लग्न मोडत वऱ्हाडींना माघारी पाठविले. हे तिचे धाडस पाहून मंडपात उपस्थित असलेल्या एका नातेवाईकाने त्यांच्या शिकलेल्या मुलाशी लग्नाचा प्रस्ताव देत लग्न लावून दिले. 

हे प्रकरण 13 मार्चचे आहे. याआधीही बऱ्याच लग्नसमारंभांमध्ये हुंडा मागितला म्हणून किंवा मद्यप्राशन करून धिंगाना घातला म्हणून लग्ग मंडपातून वधूने वरात मागे पाठविल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, ही घटना वेगळीच आहे. पंडौल येथील ब्रम्होत्तरा गावातील मुलाचे लग्न मोमीनपूर गावातील मुलीशी 13 मार्चला ठरले होते. लग्न लागले. वरमाळाही घातल्या. यानंतर मंडपामध्ये नववधूच्या मैत्रिणी नवरदेवासोबत गप्पा मारत होत्या. तेव्हा त्यांना नवरदेव अशिक्षित असल्याची शंका आली. यामुळे नववधूच्या मैत्रिणींनी त्याला अनेक प्रश्न विचारले, मात्र तो या प्रश्नांची उत्तरे देऊ शकला नाही. 

यामुळे या मैत्रिनींनी या नवरदेवाला शंभराच्या 10 नोटा मोजण्यास सांगितले. मात्र, तीन वेळा संधी देऊनही त्याला या नोटा किती आहेत आणि एकून किती मुल्य होते याबाबत सांगता आले नाही. यानंतर गोंधळलेल्या नवरदेवाला त्याचे आणि गावाचे नावही विचारण्यात आले. त्यानंतर जिल्ह्याचे नाव विचारताच त्याने पंडौल असे सांगितले. या उत्तरांवरून हा नवरदेव अशिक्षित असल्याचे लक्षात आले. त्यांनी नववधूला ही बाब सांगितली. यावर नववधूने धाडस दाखवत गळ्यात वरमाला पडलेली असतानाही लग्न मोडले आणि वरातींनी माघारी पाठवून दिले.  

यावेळी या लग्नाला उपस्थित असलेल्या एक व्यक्तीने तिच्या या धाडसाचे कौतूक करत त्याच्या शिकलेल्या मुलाशी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला. माझा मुलगा चांगला शिकलेला आहे, तू त्याच्याशी लग्न करशील का? असे म्हणत मागणी घातली. यावर मुलीकडच्यांनी काही वेळ विचार करत लगेचच होकार देत लग्नाचा बार उडवून दिला.  

टॅग्स :marriageलग्नBiharबिहार