शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

CAA वरून भाजपनेते स्वपक्षावरच भडकले, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 12:54 IST

दुसऱ्या ट्विटमध्ये ते म्हणाले की, भारत देशाची दुसऱ्या देशांशी तुलना करू नका. त्याचे कारण म्हणजे हा देश सर्व धर्म आणि समुदायासाठी खुला आहे. भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलकडून या कायद्यासंदर्भात जागृती करण्यास सुरू केल्यानंतर ही बाब समोर आली आहे.

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने सोमवारी कोलकाता येथे (CCA) नागरिकता संशोधन कायद्याच्या समर्थनात रॅली काढली होती. मात्र काही वेळातच पश्चिम बंगालमधील भाजप नेते आणि सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्रकुमार बोस यांनी नागरिकता संशोधन कायद्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून पक्षाला घरचा आहेर दिला आहे.

नागरिकता संशोधन कायद्यासंदर्भात चंद्रकुमार बोस म्हणाले की,  भारत एक असा देश आहे जेथे सर्व धर्माच्या आणि समूदायाच्या लोकांचे स्वागत करण्यात येते. जर नागरिकता संशोधन कायदा कोणत्याही धर्माशी निगडीत नाही, तर मग यात हिंदू, शिख, बुद्ध पारसी आणि जैन यांचाच समावेश का आहे. मुस्लीमांना यात सामील का केले नाही, असा सवालही त्यांनी ट्विट करून उपस्थित केला आहे. 

दुसऱ्या ट्विटमध्ये ते म्हणाले की, भारत देशाची दुसऱ्या देशांशी तुलना करू नका. त्याचे कारण म्हणजे हा देश सर्व धर्म आणि समुदायासाठी खुला आहे. भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलकडून या कायद्यासंदर्भात जागृती करण्यास सुरू केल्यानंतर ही बाब समोर आली आहे.

कोलकाता येथे या कायद्याच्या समर्थनात काढण्यात आलेल्या रॅलीला भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा उपस्थित होते. तर तृणमूल काँग्रेसकडून जनतेत गैरसमज निर्माण करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले होते. आता मात्र पक्षाचे नेतेच या कायद्याच्या विरोधात बोलले आहे.