शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
3
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
4
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
5
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
6
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
7
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल
8
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
9
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
10
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
11
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
12
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
13
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
14
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
15
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
16
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
17
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
18
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
19
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
20
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   

आजी-आजोबा नातवासह ४ जणांचा दुर्दैवी अंत; कुटुंबासह परिसरातील लोक हादरले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2021 12:16 PM

अग्निशमन दलाच्या गाड्या येण्यास विलंब झाल्याने लोकांमध्ये आक्रोश पसरला.

उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्यात बुधवारी रात्री मनाला चटका लावणारी दुर्घटना घडली आहे. याठिकाणी शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत आजी आजोबा, नातवासह ४ लोकांचा जळून मृत्यू झाला आहे. यात दोन चिमुरड्या गंभीररित्या जखमी झाल्यात. गोपीगंजनगरच्या चुडिहरी परिसरात ही दुर्घटना घडली. ज्यावेळी घरात आग लागली तेव्हा सर्वजण आरामात झोपले होते. दिवाळीच्या पहाटेच घडलेल्या दुर्घटनेमुळं संपूर्ण परिसरातील लोक शोकाकुळ झाले आहेत.

या दुर्घटनेत मोहम्मद असलम, त्यांची पत्नी शकीला सिद्धीकी, नात तश्किया, मुलगी तस्लीम, अलवीरा, रौनक हे घराच्या तिसऱ्या मजल्यावर झोपले होते. यावेळी रात्री १ च्या सुमारात घरातील शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. त्यात या ४ जणांचा मृत्यू झाला. आगीच्या विळख्यात अडकलेले शकीला आणि मोहम्मद असलम यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर इतर तडफडत राहिले.

आगीत भाजलेल्या मुलांना प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. याठिकाणाहून तश्किया, तस्लीम, अलवीराचा मुलगा शराफत यांना ट्रामा सेंटरला नेण्यात आलं. यावेळी उपचारावेळी तश्किया आणि अलवीरा यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमसाठी पाठवले. आगीत घरातील सर्व सामान जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस अधीक्षक अनिल कुमार, अधिकारी अशोक कुमार सिंह इतर पोलीस कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी पोहचले. नातेवाईकांनी अग्निशमन दलाच्या गाड्यांनाही फोन करुन बोलावलं होतं. परंतु त्या लेट आल्या.

अग्निशमन दलाच्या गाड्या येण्यास विलंब झाल्याने लोकांमध्ये आक्रोश पसरला. एकाच घरातील चौघांच्या मृत्यूनंतर परिसरात शांतता पसरली. रौनक झोपेतून जागा झाला तेव्हा आगीची पर्वा न करता तो खाली पळत आला. त्याने ही दुर्घटना सगळ्यांना सांगितली. रौनक जागा नसता झाला तर आगीनं आणखी रौद्ररुप धारण करत परिसरातील इतर घरांनाही नुकसान पोहचवलं असतं. रौनकमुळे इतरांचा जीव बचावला. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत असून नेमकी रात्रीच्या वेळी शॉर्ट सर्किट कसं झालं? याचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे मृत लोकांच्या नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश