शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

आजी-आजोबा नातवासह ४ जणांचा दुर्दैवी अंत; कुटुंबासह परिसरातील लोक हादरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2021 12:17 IST

अग्निशमन दलाच्या गाड्या येण्यास विलंब झाल्याने लोकांमध्ये आक्रोश पसरला.

उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्यात बुधवारी रात्री मनाला चटका लावणारी दुर्घटना घडली आहे. याठिकाणी शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत आजी आजोबा, नातवासह ४ लोकांचा जळून मृत्यू झाला आहे. यात दोन चिमुरड्या गंभीररित्या जखमी झाल्यात. गोपीगंजनगरच्या चुडिहरी परिसरात ही दुर्घटना घडली. ज्यावेळी घरात आग लागली तेव्हा सर्वजण आरामात झोपले होते. दिवाळीच्या पहाटेच घडलेल्या दुर्घटनेमुळं संपूर्ण परिसरातील लोक शोकाकुळ झाले आहेत.

या दुर्घटनेत मोहम्मद असलम, त्यांची पत्नी शकीला सिद्धीकी, नात तश्किया, मुलगी तस्लीम, अलवीरा, रौनक हे घराच्या तिसऱ्या मजल्यावर झोपले होते. यावेळी रात्री १ च्या सुमारात घरातील शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. त्यात या ४ जणांचा मृत्यू झाला. आगीच्या विळख्यात अडकलेले शकीला आणि मोहम्मद असलम यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर इतर तडफडत राहिले.

आगीत भाजलेल्या मुलांना प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. याठिकाणाहून तश्किया, तस्लीम, अलवीराचा मुलगा शराफत यांना ट्रामा सेंटरला नेण्यात आलं. यावेळी उपचारावेळी तश्किया आणि अलवीरा यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमसाठी पाठवले. आगीत घरातील सर्व सामान जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस अधीक्षक अनिल कुमार, अधिकारी अशोक कुमार सिंह इतर पोलीस कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी पोहचले. नातेवाईकांनी अग्निशमन दलाच्या गाड्यांनाही फोन करुन बोलावलं होतं. परंतु त्या लेट आल्या.

अग्निशमन दलाच्या गाड्या येण्यास विलंब झाल्याने लोकांमध्ये आक्रोश पसरला. एकाच घरातील चौघांच्या मृत्यूनंतर परिसरात शांतता पसरली. रौनक झोपेतून जागा झाला तेव्हा आगीची पर्वा न करता तो खाली पळत आला. त्याने ही दुर्घटना सगळ्यांना सांगितली. रौनक जागा नसता झाला तर आगीनं आणखी रौद्ररुप धारण करत परिसरातील इतर घरांनाही नुकसान पोहचवलं असतं. रौनकमुळे इतरांचा जीव बचावला. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत असून नेमकी रात्रीच्या वेळी शॉर्ट सर्किट कसं झालं? याचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे मृत लोकांच्या नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश