शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

आजी-आजोबा नातवासह ४ जणांचा दुर्दैवी अंत; कुटुंबासह परिसरातील लोक हादरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2021 12:17 IST

अग्निशमन दलाच्या गाड्या येण्यास विलंब झाल्याने लोकांमध्ये आक्रोश पसरला.

उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्यात बुधवारी रात्री मनाला चटका लावणारी दुर्घटना घडली आहे. याठिकाणी शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत आजी आजोबा, नातवासह ४ लोकांचा जळून मृत्यू झाला आहे. यात दोन चिमुरड्या गंभीररित्या जखमी झाल्यात. गोपीगंजनगरच्या चुडिहरी परिसरात ही दुर्घटना घडली. ज्यावेळी घरात आग लागली तेव्हा सर्वजण आरामात झोपले होते. दिवाळीच्या पहाटेच घडलेल्या दुर्घटनेमुळं संपूर्ण परिसरातील लोक शोकाकुळ झाले आहेत.

या दुर्घटनेत मोहम्मद असलम, त्यांची पत्नी शकीला सिद्धीकी, नात तश्किया, मुलगी तस्लीम, अलवीरा, रौनक हे घराच्या तिसऱ्या मजल्यावर झोपले होते. यावेळी रात्री १ च्या सुमारात घरातील शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. त्यात या ४ जणांचा मृत्यू झाला. आगीच्या विळख्यात अडकलेले शकीला आणि मोहम्मद असलम यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर इतर तडफडत राहिले.

आगीत भाजलेल्या मुलांना प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. याठिकाणाहून तश्किया, तस्लीम, अलवीराचा मुलगा शराफत यांना ट्रामा सेंटरला नेण्यात आलं. यावेळी उपचारावेळी तश्किया आणि अलवीरा यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमसाठी पाठवले. आगीत घरातील सर्व सामान जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस अधीक्षक अनिल कुमार, अधिकारी अशोक कुमार सिंह इतर पोलीस कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी पोहचले. नातेवाईकांनी अग्निशमन दलाच्या गाड्यांनाही फोन करुन बोलावलं होतं. परंतु त्या लेट आल्या.

अग्निशमन दलाच्या गाड्या येण्यास विलंब झाल्याने लोकांमध्ये आक्रोश पसरला. एकाच घरातील चौघांच्या मृत्यूनंतर परिसरात शांतता पसरली. रौनक झोपेतून जागा झाला तेव्हा आगीची पर्वा न करता तो खाली पळत आला. त्याने ही दुर्घटना सगळ्यांना सांगितली. रौनक जागा नसता झाला तर आगीनं आणखी रौद्ररुप धारण करत परिसरातील इतर घरांनाही नुकसान पोहचवलं असतं. रौनकमुळे इतरांचा जीव बचावला. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत असून नेमकी रात्रीच्या वेळी शॉर्ट सर्किट कसं झालं? याचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे मृत लोकांच्या नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश