शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

अर्थव्यवस्थेवर निर्दयी हल्ला; आरबीआयच्या नफ्यापैकी ९९% रक्कम घेतेय सरकार - सीताराम येचुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2019 08:14 IST

भारतातील सर्व सीपीआय-एमच्या शाखांनी अर्थव्यवस्था आणि जनतेच्या जीवनमानावर निर्दयी घाला घालण्याच्या या प्रकाराचा संघटितपणे निषेध करावा, असे आवाहनही पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीने केले आहे.

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने सरकारला घसघशीत रक्कम देऊ केल्यावरुन भारतीय कम्युनिस्ट (मार्क्सवादी) पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी केंद्र सरकारवर तोफ डागली. २०१४ पासून सरकार रिझर्व्ह बँकेच्या नफ्यापैकी ९९ टक्के रक्कम घेत आहे, असा आरोप केला.

भारतातील सर्व सीपीआय-एमच्या शाखांनी अर्थव्यवस्था आणि जनतेच्या जीवनमानावर निर्दयी घाला घालण्याच्या या प्रकाराचा संघटितपणे निषेध करावा, असे आवाहनही पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीने केले आहे. मागणीचा अभाव आणि सरकारने आरबीआय लाभाशांतील एवढा मोठा निधी लाटून लादलेल्या आर्थिक बोझ्याने सार्वजनिक क्षेत्रातील नवरत्न श्रेणीतील अग्रणी कंपन्याचे मोठे नुकसान झाले आहे, असे सीताराम येचुरी यांनी ट्विट केले आहे. 

दुसरीकडे, काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, सरकारचा प्रयत्न वित्तीय सुजाणपणा की, वित्तीय हाराकिरी म्हणावी. अंदाजपत्रकातील आकडेमोडीतील गायब रकमेएवढीच रक्कम बँकेकडून घेण्यात आली आहे, यावरही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

चोरी करून काहीही होणार नाही - राहुल गांधीरिझर्व्ह बँकेचे पैसे चोरी करून काहीही होणार नाही. स्वनिर्मित आर्थिक संकटावर काय उपाय करावा, हे पंतप्रधान आणि वित्तमंत्र्यांना सुचेनासे झाले आहे. रिझर्व्ह बँकेच्या अतिरिक्त शिलकी निधीतून पैसे घेण्याचा प्रकार म्हणजे बंदुकीच्या गोळीने झालेल्या दुर्धर जखमेवर दवाखान्यातून चोरलेली मलमपट्टी करण्यासारखा आहे, अशा परखड शब्दांत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट करुन सरकारवर निशाणा साधला.

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाNarendra Modiनरेंद्र मोदी