शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपाल कळसूत्री बाहुली असतात का? राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेतील प्रश्नानं विद्यार्थी चकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 17:01 IST

राज्यसेवा आयोगानं केले हात वर

पाटणा: राज्यपाल कळसूत्री बाहुली असतात का, असा प्रश्न बिहारच्या राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेत विचारण्यात आला. त्यामुळे परीक्षेला आलेले विद्यार्थी चकीत झाले. भारताच्या आणि विशेषत: बिहारच्या राजकारणातील राज्यपालांचे स्थान काय? ते केवळ कळसूत्री बाहुली असतात का?, असे प्रश्न परीक्षेत विचारण्यात आले होते. राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाची बरीच चर्चा झाली. यानंतर राज्यसेवा आयोगानं यामध्ये आपली चूक नसल्याचं स्पष्ट केलं. प्रश्नपत्रिका तयार करणारे शिक्षकच यात दोषी असल्याचं आयोगानं म्हटलं. त्या प्रश्नात कोणतीही चूक नाही. मात्र कळसूत्री बाहुली हा शब्द टाळता आला असता, असं आयोगानं म्हटलं. सध्या बिहारमध्ये संयुक्त जनता दल आणि भाजपाची सत्ता आहे. संयुक्त जनता दलाचे नितीश कुमार सरकारचं नेतृत्व करत आहेत. पुढील वर्षी राज्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. राज्यसभा आयोगाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना राजकीय पक्षांची संख्या आणि निवडणूक याबद्दलही प्रश्न विचारण्यात आला. जास्त पक्षांनी निवडणूक लढवण्याचे फायदे आणि तोटे सांगा, असा प्रश्न परीक्षेत विचारला गेला. बिहारच्या शालेय परीक्षादेखील कायम वादामुळे चर्चेत राहिल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी आठवीच्या परीक्षेत विचारण्यात आलेला एक प्रश्न अतिशय वादग्रस्त ठरला होता. पाच देशांच्या नागरिकांना काय म्हणालं, असा प्रश्न विचारण्यात आला होता. चीन, नेपाळ, इंग्लंड, भारत आणि काश्मीर अशी नावं त्यापुढे देण्यात आली होती. 

 

टॅग्स :Biharबिहारexamपरीक्षा