शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Policy: कर्जदारांना खूशखबर, हप्ता कमी होणार; दरकपात का होणार?
2
पाकिस्तानी निमलष्करी दलाच्या तळावर हल्ला, बॉम्बस्फोट; तीन जण ठार
3
Post Office च्या या स्कीममध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
4
लग्नानंतर देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; भीषण अपघातात ५ जण जागीच ठार, सुदैवाने नवरा नवरी वाचले
5
Local Body ELections: उमेदवारीसाठी पैसे मागितल्याच्या आरोपावरून भाजपचे दोन गट भिडले
6
आजपासून संसदेचे अधिवेशन! पान मसाला, सिगारेट, तंबाखु महागणार; सरकार विधेयक सादर करणार
7
Nepal Earthquake: भारताच्या शेजारी देशात ४.४ तीव्रतेचा भूकंप; नागरिकांमध्ये घबराट!
8
Philippines Protest 2025: फिलिपिन्समध्ये लोक रस्त्यावर; भ्रष्टाचाराविरोधात देशभरात आंदोलन पेटले
9
Bigg Boss Marathi: रितेश देशमुखच असणार 'बिग बॉस मराठी'चा होस्ट, सलमान खान म्हणाला- "भाऊ तुम्ही..."
10
आजचे राशीभविष्य, १ डिसेंबर २०२५: भविष्यासाठी आर्थिक नियोजन करण्यास आजचा दिवस अनुकूल
11
Local Body Elections: नगरांच्या निवडणुकांमध्ये 'दुसरा' टप्पा, काही ठिकाणी २० डिसेंबरला मतदान
12
अग्रलेख : शेवटी मरण कार्यकर्त्यांचेच! अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार?
13
फोनमध्ये सिम नसल्यास ॲप्स वापरता येणार नाहीत; दर सहा तासांनी व्हॉट्सॲप्स वेब थेट लॉगआउट होणार!
14
नगर परिषद, नगर पंचायत निवडणूक २०२५:  रात्री दहापर्यंत पडणार आश्वासनांचा 'पाऊस'!
15
विशेष लेख: इम्रान खान जिवंत आहेत की नाहीत?
16
Vande Bharat Depot: पुण्यासह राज्यात तीन ठिकाणी वंदे भारत 'कोचिंग डेपो' वाढविणार
17
मध्य रेल्वेवर लवकरच २० प्लॅटफॉर्म वाढणार, कोकणसाठी अतिरिक्त मेल, एक्स्प्रेस चालवणे शक्य
18
IND vs SA 1st ODI : टॉस गमावला, पण मॅच जिंकली! कसोटीतील बिघाडीनंतर टीम इंडियाची वनडे मालिकेत आघाडी
19
हाताला सलाइन, नाकाला ऑक्सिजन पाइप; छगन भुजबळांचा रुग्णालयातून प्रचार, भावनिक होत म्हणाले...
20
“मुंबईत ठाकरेंचे काही चालणार नाही, उद्धव यांनी राज यांना सोबत घेऊन चूक केली”; कुणाचा दावा?
Daily Top 2Weekly Top 5

नेटिझन्ससमोर सरकार नरमले, नेट न्यूट्रलिटीला पाठिंबा देणार ?

By admin | Updated: April 14, 2015 18:45 IST

नेट न्यूट्रलिटी अबाधित ठेवण्यासाठी नेटिझन्सने सुरु केलेल्या मोहीमेसमोर केंद्र सरकार नरमले असून नेट न्यूट्रलिटीला केंद्र सरकारही पाठिंबा देईल अशी चिन्हे आहेत.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १४ - नेट न्यूट्रलिटी अबाधित ठेवण्यासाठी नेटिझन्सने सुरु केलेल्या मोहीमेसमोर केंद्र सरकार नरमले असून नेट न्यूट्रलिटीला केंद्र सरकारही पाठिंबा देईल अशी चिन्हे आहेत. या प्रकरणावर केंद्र सरकारने एक समितीही नेमली आहे. 
 
नेट न्यूट्रलिटीचा मुद्दा सध्या चांगलाच तापला असून सोशल मिडीयावर या विरोधात मोहीमही सुरु आहे. शाहरुख खान, फरहान अख्तर यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांनीही नेट न्यूट्रलिटीचे समर्थन केले आहे. टेलिकॉम कंपन्या इंटरनेटच्या वापरावर फिल्टर लावण्याचा प्रयत्न करत असून या माध्यमातून इंटरनेटवर आधारित प्रत्येक अॅप व वेबसाईटसाठी स्वतंत्र पॅकेज  आकारण्याची हालचाल  इंटरनेट सुविधा देणा-या कंपन्यांनी सुरू केली आहे. यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागेल. टेलिकॉम कंपनांच्या या चलाखीविरोधात सोशल मिडीयावर टीकेची झोड उठली असून टेलिकॉम कंपन्यांच्या या निर्णयाविरोधात ट्रायकडे लाखो ईमेल्स पाठवले जात आहेत. 
 
सोशल मिडीयावरील या आक्रमक मोहीमेसमोर आता केंद्र सरकारही नरमले आहे. संपर्क व माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सोमवारी नेट न्यूट्रलिटीला पाठिंबा देण्याचे संकेत दिले. प्रसाद म्हणाले, इंटरनेट ही काळाची गरज असून इंटरनेटवर कोणताही भेदभाव न करता सर्व माहिती प्रत्येकाला उपलब्ध होणे गरजेचे आहे. दूरसंचार खात्याने यासंदर्भात एक समिती नेमली असून ही समिती मेच्या दुस-या आठवड्यापर्यंत आपला अहवाल सादर करेल असे त्यांनी सांगितले. डिजिटल इंडियामोहीमेसाठी समाजातील तळागाळापर्यंत इंटरनेट पोहोचणे गरजेचे आहे असा पुनरुच्चारही त्यांनी केला.  
केंद्र सरकारने नेमलेली समिती ही ट्रायच्या अंतर्गत येणार नाही. त्यामुळे नेट न्यूट्रलिटीसंदर्भात ट्रायने टेलिकॉम कंपन्याच्या बाजूने निकाल दिला तरी या समितीच्या अहवालाद्वारे केंद्र सरकार नेट न्यूट्रलिटी अबाधित ठेवू शकते. 
 
फ्लिपकार्टची एअरटेलसोबतच्या करारातून माघार
दरम्यान नेट न्युट्रॅलिटीच्या मुद्यावरून सोशल मीडियावर वातावरण तापलेले असून ऑनलाइन व्यवहार क्षेत्रातील मोठी कंपनी असलेल्या फ्लिपकार्टवरही टीकेचा भडिमार झाला आहे. त्यामुळे नेटीझन्सच्या रोषास पात्र ठरलेल्या या कंपनीने एअरटेल सोबतच्या 'झिरो प्लॅन'मधून माघार घेतली असून कंपनीच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटरून त्यासंबंधी घोषणा करण्यात आली आहे. इंटरनेटमुळेच आम्ही इथपर्यंत पोचलो असून आमचा नेट न्युट्रॅलिटीवर विश्वास असल्याचे कंपनीने निवेदनात म्हटले आहे. 
 
नेट न्यूट्रॅलिटी म्हणजे काय ?
नेट न्यूट्रॅलिटी हे इंटरनेट वापरासंबंधीचे तत्त्व आहे. इंटरनेटच्या माध्यमातून मुक्तपणे संवाद साधण्याचा ग्राहकाचा हक्क यात अबाधित केला गेला आहे. यातली एक बाब अशी की, कुठलीही इंटरनेट सेवा पुरवणारी कंपनी तिने पुरविलेल्या इंटरनेटवरून कुठल्याही संकेतस्थळाचा वापर करण्यापासून ग्राहकाला रोखू शकत नाही; मात्र नेट न्यूट्रॅलिटी नसेल तर टेलिकॉम कंपन्या इंटरनेट वापरण्यावर बंधने आणू शकतात.
 
टेलिकॉम कंपन्यांचा नफा घटला
■ वाढीव दर आकारण्याचे कारण म्हणजे सुरुवातीला मोबाइलचा वापर फोन किंवा एसएमएस करण्यासाठी केला जात असे; मात्र व्हॉट्स अँप, व्हायबर, हाईक सारखे अॅप्स आले त्यामुळे मेसेज आणि फोनचे प्रमाण घटले. पर्यायाने टेलिकॉम कंपन्यांचा नफा घटला. त्यामुळे त्यांना इंटरनेटच्या नफ्यातील भागीदारी हवी आहे. तसेच फेसबुक, गुगल या कंपन्या इतरांचे इन्फ्रास्ट्रक्चर वापरून नफा कमवत आहेत. त्यामुळे यावर उपाय म्हणून टेलिकॉम कंपन्यांना आपले दर हवे तसे, हवे तितके ठेवण्याची सवलत हवी आहे.
'एआयबी'वर व्हिडीओ व्हायरल 
■ अभद्र भाषेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या 'एआयबी' या शोच्या माध्यमातून नेट न्यूट्रॅलिटीबाबतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये काही हास्यकलाकारांनी नागरिकांना या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
 
फेसबुकवरही मोहीम
■ ट्रायच्या या भूमिकेचा विरोध करण्यासाठी फेसबुकरही मोहीम सुरू करण्यात आली आहे. सेव्ह द इंटरनेट या नावाने पेज तयार करून त्यावर ट्रायच्या भूमिकेबाबत हरकती नोंदविण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.