शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

भाड्याच्या घरात राहणाऱ्यांसाठी मोठी बातमी; मोदी सरकार लवकरच आणतंय 'हा' नवा कायदा

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: November 26, 2020 16:45 IST

रियल इस्टेट कंपन्यांचे संघटन नारेडकोने आयोजित केलेल्या वेबिनारला संबोधित करताना मिश्रा म्हणाले, स्थलांतरितांसाठी योग्य भाडे गृहनिर्माण संकूल (एआरएचसी) योजनेचे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमाने शहरांतील झोपडपट्ट्यांना आळा घातला जाऊ शकतो.

ठळक मुद्देयामुळे रियल इस्टेट क्षेत्राला, विशेषतः भाड्याच्या घरांना प्रोत्साहन मिळेल.मंत्रालयने जुलै, 2019मध्ये आदर्श भाडे कायद्याचा मसुदा जारी केला होता.विविध भाषांमध्ये त्याचा अनुवाद केला जात आहे.

नवी दिल्ली - सरकार लवकरच आदर्श भाडे कायदा (Adarsh Rent Act) आणण्याच्या तयारीत आहे. गृहनिर्माण व नागरी व्यवहार सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. यामुळे रियल इस्टेट क्षेत्राला, विशेषतः भाड्याच्या घरांना प्रोत्साहन मिळेल.

मंत्रालयने जुलै, 2019मध्ये आदर्श भाडे कायद्याचा मसुदा जारी केला होता. रियल इस्टेट कंपन्यांचे संघटन नारेडकोने आयोजित केलेल्या वेबिनारला संबोधित करताना मिश्रा म्हणाले, स्थलांतरितांसाठी योग्य भाडे गृहनिर्माण संकूल (एआरएचसी) योजनेचे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमाने शहरांतील झोपडपट्ट्यांना आळा घातला जाऊ शकतो. सरकारने काही महिन्यांपूर्वीच या योजनेची सुरुवात केली आहे.

घराच्या विक्रीत सुधारणा -मिश्रा म्हणाले, अर्थव्यवस्था 'अनलॉक' केल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारांकडून करण्यात आलेल्या उपायांमुळे आता घरांच्या विक्रीत सुधारणा होत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकसारख्या राज्यांनी संपत्तीच्या नोंदणीवरील स्टँप शुल्कदेखील कमी केले आहे. यामुळे घराच्या विक्रीत वृद्धी झाली आहे. केंद्राने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना स्टॅम्प शुल्क कमी करण्याचा सल्ला दिला आहे. जेने करून यामुळे गृहनिर्माण क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल.

आदर्श भाडे कायदा तयार -मिश्रा म्हणाले, 'आदर्श भाडे कायदा तयार आहे. विविध भाषांमध्ये त्याचा अनुवाद केला जात आहे. याचा मोठा परिणाम होणार आहे.' तसेच, या प्रस्तावित आदर्श भाडे कायद्यावर आक्षेप नोंदविण्यासाठी देण्यात आलेला कालावधी 31 ऑक्टोबरला संपुष्टात आला आहे. आता यावर राज्यांकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत. आदर्श भाडे कायदा लवकरच येईल, असेही मिश्रा म्हणाले.

रियल इस्टेट क्षेत्राला मिळेल प्रोत्साहन -मिश्रा म्हणाले, 2011च्या जनगणनेनुसार, 1.1 कोटी घरे रिकामी आहेत. कारण लोकांना आपले घर भाड्याने द्यायची भीती वाटते. मात्र, या कायद्यामुळे, सर्व प्रकारच्या विसंगती दूर होतील आणि रियल इस्टेट क्षेत्राला गती मिळेल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारReal Estateबांधकाम उद्योग