शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

अपघातग्रस्ताची मदत करणा-यास दिल्ली सरकारकडून दोन हजार रूपयांचं बक्षिस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 06:43 IST

'चांगलं काम' करणा-या व्यक्तींसाठी नवी योजना, या योजनेनुसार 'चांगलं काम' करणा-यास दोन हजार रूपयांचं बक्षिस

नवी दिल्ली - अपघातग्रस्तांची मदत करणा-या व्यक्तींसाठी दिल्ली सरकार लवकरच एक नवी योजना सुरू करणार आहे. या योजनेनुसार मदत करणा-या व्यक्तीस दोन हजार रूपयांचं बक्षिस देण्यात येणार आहे. या योजनेला दिल्ली सरकारने जानेवारी महिन्यात मंजुरी दिली होती. लवकरच ही योजना अंमलात येणार आहे. इतरांची मदत करण्यास, चांगलं काम करण्यास लोकांना प्रोत्साहन मिळावं हा या योजनेमागचा उद्देश असल्याचं दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितलं. बिजनेस स्टॅन्डर्डने याबाबत वृत्त दिलं आहे. काय असेल चांगलं काम -रस्त्याने कुठे जाताना तुम्हाला कोणाचा अपघात झाल्याचं दिसल्यास त्या जखमीला शक्य तेवढ्या लवकर जवळच्या सरकारी अथवा खासगी कोणत्याही रूग्णालयात भरती करावं. जखमीची योग्य वेळेस मदत करून त्याला रूग्णालयात पोहोचवणा-यास दोन हजार रूपयांचं बक्षिस देण्यात येईल, असं जैन म्हणाले. जखमीच्या उपचाराचा खर्चही दिल्ली सरकारच करेल असंही जैन यांनी सांगितलं. ही योजना कशासाठी -गेल्या वर्षी दिल्लीच्या सुभाष नगरमध्ये अपघातात जखमी झालेल्या एका व्यक्तीचा कोणीही मदत न केल्याने उपचाराअभावी दुर्देवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर अशाप्रकारची योजना सुरू करण्याचा विचार दिल्लीच्या केजरीवाल सरकारने केला होता. इतरांना मदत करणा-यांना या योजनेमुळे प्रोत्साहन मिळेल असा विश्वास जैन यांनी यावेळी व्यक्त केला.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपNew Delhiनवी दिल्ली