शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

अपघातग्रस्ताची मदत करणा-यास दिल्ली सरकारकडून दोन हजार रूपयांचं बक्षिस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 06:43 IST

'चांगलं काम' करणा-या व्यक्तींसाठी नवी योजना, या योजनेनुसार 'चांगलं काम' करणा-यास दोन हजार रूपयांचं बक्षिस

नवी दिल्ली - अपघातग्रस्तांची मदत करणा-या व्यक्तींसाठी दिल्ली सरकार लवकरच एक नवी योजना सुरू करणार आहे. या योजनेनुसार मदत करणा-या व्यक्तीस दोन हजार रूपयांचं बक्षिस देण्यात येणार आहे. या योजनेला दिल्ली सरकारने जानेवारी महिन्यात मंजुरी दिली होती. लवकरच ही योजना अंमलात येणार आहे. इतरांची मदत करण्यास, चांगलं काम करण्यास लोकांना प्रोत्साहन मिळावं हा या योजनेमागचा उद्देश असल्याचं दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितलं. बिजनेस स्टॅन्डर्डने याबाबत वृत्त दिलं आहे. काय असेल चांगलं काम -रस्त्याने कुठे जाताना तुम्हाला कोणाचा अपघात झाल्याचं दिसल्यास त्या जखमीला शक्य तेवढ्या लवकर जवळच्या सरकारी अथवा खासगी कोणत्याही रूग्णालयात भरती करावं. जखमीची योग्य वेळेस मदत करून त्याला रूग्णालयात पोहोचवणा-यास दोन हजार रूपयांचं बक्षिस देण्यात येईल, असं जैन म्हणाले. जखमीच्या उपचाराचा खर्चही दिल्ली सरकारच करेल असंही जैन यांनी सांगितलं. ही योजना कशासाठी -गेल्या वर्षी दिल्लीच्या सुभाष नगरमध्ये अपघातात जखमी झालेल्या एका व्यक्तीचा कोणीही मदत न केल्याने उपचाराअभावी दुर्देवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर अशाप्रकारची योजना सुरू करण्याचा विचार दिल्लीच्या केजरीवाल सरकारने केला होता. इतरांना मदत करणा-यांना या योजनेमुळे प्रोत्साहन मिळेल असा विश्वास जैन यांनी यावेळी व्यक्त केला.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपNew Delhiनवी दिल्ली