शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

शत्रू मालमत्ता कायद्यातून सरकार मिळवणार तीन हजार कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 05:38 IST

जे लोक फाळणीनंतर भारत सोडून गेले, त्यांची मालमत्ता विकण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्या विकल्यास सुमारे ३ हजार कोटी रुपये मिळू शकतील, असा अंदाज आहे.

नवी दिल्ली : जे लोक फाळणीनंतर भारत सोडून गेले, त्यांची मालमत्ता विकण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्या विकल्यास सुमारे ३ हजार कोटी रुपये मिळू शकतील, असा अंदाज आहे. कायदा व न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांना ही माहिती दिली.फाळणीनंतर पाकिस्तानात अथवा ५0 वर्षांपूर्वी चीनला स्थलांतर केलेल्या लोकांच्या मालमत्तांबाबतच्या शत्रू संपत्ती कायद्यात (एनिमी प्रॉपर्टी अ‍ॅक्ट-१९६८) मध्ये केंद्र सरकारने सुधारणा केली होती. मात्र ते विधेयक संसदेत संमत न झाल्याने त्याचा वटहुकूम केंद्र सरकारने काढला होता. त्याची आता अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या कायद्यान्वये भारत सोडून पाकिस्तान वा चीनला गेलेल्या या मंडळींना त्यांच्या येथील मालमत्तांवर अधिकार सांगता येत नाही. या सर्व मालमत्ता आता विकण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झाला आहे.लखनऊच्या राजाची सर्वाधिक मालमत्तालखनऊमधील राजा महमूदाबाद यांच्याकडे सर्वाधिक मालमत्ता होती. केंद्र सरकार प्रत्यक्षात या कायद्यान्वये त्या मंडळींचे विविध कंपन्यांमधील शेअर्स विकणार आहे. सध्या सुमारे २० हजार शेअरधारकांचे ९९६ कंपन्यांमधील ६.५ कोटी शेअर्स एनिमी प्रॉपर्टी आॅफ इंडियाच्या कस्टोडियन कार्यालयाकडे आहेत. ५८८ कंपन्या आजही सक्रिय आहेत. म्हणजेच सध्या अस्तित्वात व सक्रिय असलेल्या कंपन्यांमधील या मंडळींचे शेअर्स सरकार विकणार आहे.

टॅग्स :Governmentसरकार