शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

पुन्हा सरकार विरुद्ध शेतकरी?; शेतकऱ्यांचे आजपासून लखीमपूर खिरीमध्ये आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 07:41 IST

केंद्र सरकारने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना या समितीमध्ये ३ सदस्य नामनिर्देशित करण्याचा आग्रह केला होता.

नवी दिल्ली : केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा संघर्षाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशावरून केंद्र सरकार कृषी सुधारणांबाबत गठित करण्यात आलेल्या समितीची पहिली बैठक घेण्याची तयारी करीत असतानाच शेतकरी गुरुवारपासून आणखी एक आंदोलन सुरू करीत आहेत. भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते जयंत चौधरी राकेश टिकैत यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त किसान मोर्चा गुरुवारी सकाळी तीन दिवसांसाठी लखीमपूर खिरीमध्ये महापंचायत घेणार आहे. जिल्हे, राज्यांमध्ये आंदोलन केल्यानंतर किसान पंचायत दोन ऑक्टोबर रोजी दिल्लीत विशाल निदर्शने करणार आहे.

मागील वर्षी २ ऑक्टोबर रोजीच केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष याने लखीमपूर खिरीमध्ये शेतकऱ्यांवर वाहन चालविले होते. यात चार शेतकरी ठार झाले होते. यानंतर काही कालावधीत केंद्र सरकारने तीन वादग्रस्त कृषी कायदे परत घेतले होते. आंदोलनात मरण पावलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यापासून ते गुन्हे मागे घेण्याची घोषणाही केली होती. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाच्या निर्देशावरून कृषी सुधारणांसाठी समिती गठित केली होती. मात्र त्यानंतर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.

ना भरपाई मिळाली, ना गुन्हे परत घेतले

केंद्र सरकारने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना या समितीमध्ये ३ सदस्य नामनिर्देशित करण्याचा आग्रह केला होता; परंतु संयुक्त किसान मोर्चाने या समितीत सहभागी होण्यास नकार दिला होता. या समितीत सर्व सरकारी सदस्य आहेत व ते आमच्या प्रतिनिधींचा आवाज दाबून टाकतील, असे कारण त्यांनी पुढे केले होते. अजय मिश्रा टेनी यांची केंद्रीय मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आलेली नाही. आजवर ना शेतकऱ्यांना भरपाई मिळाली ना सर्व आंदोलकांवरील राजकीय गुन्हे परत घेतले. अशा स्थितीत आणखी एक आंदोलन करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय उरलेला नाही. - राकेश टिकैत, भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते

टॅग्स :FarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संपrakesh tikaitराकेश टिकैत