शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

सरकारचा कर्मचाऱ्यांना झटका; कोरोनातील १८ महिन्यांचे डीए एरिअर्स देण्यास नकार; निवृत्तांनाही फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 09:56 IST

केंद्र सरकारने कोविड-१९ साथीच्या काळात आर्थिक संकट लक्षात घेऊन १ जानेवारी २०२० ते १ जुलै २०२१ या काळात डीए व डीआर यावर प्रतिबंध घातला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांना कोविड-१९ साथीच्या काळातील १८ महिन्यांच्या महागाई भत्त्याची (डीए) थकबाकी (एरिअर्स) देण्यास केंद्र सरकारने नकार देत मोठा झटका दिला आहे. निवृत्ती वेतनधारकांच्या महागाई दिलाशाची (डीआर) थकबाकीही कर्मचाऱ्यांना मिळणार नाही. ५२ लाख कर्मचारी आणि ६० लाख निवृत्तांना या निर्णयाचा फटका बसणार आहे. 

केंद्र सरकारने कोविड-१९ साथीच्या काळात आर्थिक संकट लक्षात घेऊन १ जानेवारी २०२० ते १ जुलै २०२१ या काळात डीए व डीआर यावर प्रतिबंध घातला होता. जुलै २०२१ मध्ये डीए पुन्हा सुरू करण्यात आला. तथापि, ३ हप्त्यांचा म्हणजेच १८ महिन्यांचा डीए थकीत राहिला होता. सरकारने १ जुलै २०२१ पासून महागाई भत्त्यात ११ टक्के वाढ केली होती. त्यामुळे महागाई भत्ता १७ टक्क्यांवरून २८ टक्के झाला होता.

दर ६ महिन्यांनी होते सुधारणामहागाईच्या प्रमाणात दर ६ महिन्यांनी महागाई भत्त्यात सुधारणा केली जाते. याचे मोजमाप कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनानुसार केले जाते. महागाई भत्ता हा शहरी, निम-शहरी आणि ग्रामीण भागातील वेगवेगळ्या प्रमाणात मिळतो.

अपेक्षा ठरली फोल१ जानेवारी २०२० ते ३० जून २०२१ या १८ महिन्यांच्या काळातील डीए आपल्याला मिळेल, अशी कर्मचाऱ्यांची अपेक्षा होती. डीएमधील वाढही नंतर करण्यात आल्यामुळे मागील काळाचे एरियर कर्मचाऱ्यांना मिळायला हवे होते. तथापि, आता सरकारने ते देण्यास नकार दिला आहे.

काय असतो महागाई भत्ता?महागाई वाढल्यामुळे कर्मचाऱ्यांना भरपाई म्हणून महागाई भत्ता दिला जातो. सरकारी कर्मचारी, सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक यांनाही भरपाई भत्त्याच्या स्वरूपात दिली जाते. त्याचा मोठा फायदा कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक यांना होतो.

कसा मोजतात महागाई भत्ता? महागाई भत्ता निश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने एक फॉर्म्युला निश्चित केला आहे. हा फॉर्म्युला असा आहे - [(मागील १२ महिन्यांतील अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाची सरासरी - ११५.७६) ११५.७६] x१००. ज्ञात असावे की सार्वजनिक उपक्रमाच्या डीएसाठी स्वतंत्र फॉर्म्युला वापरला जातो.

वेतनात कशी होते वाढ? समजा एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन २५ हजार रुपये आहे. तर त्याला या २५ हजार रुपयांच्या २८ टक्के डीए मिळेल. डीएमध्ये ११ टक्के वाढ झाली याचा अर्थ २५ हजारांवर ११ टक्क्यांची वाढ मिळेल. म्हणजे वेतनात प्रत्यक्षात २,७५० रुपयांची वाढ होईल.

टॅग्स :GovernmentसरकारEmployeeकर्मचारी