शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

...म्हणून पंतप्रधान मोदींनी तीन कृषी कायदे मागे घेतले; नेमके कारण अखेर समोर आले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 11:59 AM

गेल्याच आठवड्यात सरकारनं घेतला तीन कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या आठवड्यात तीन कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली. गेल्या वर्षभरापासून दिल्लीच्या सीमांवर शेतकरी तीन कायद्यांविरोधात आंदोलन करत होते. या आंदोलनादरम्यान ४०० हून अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. अखेर मोदी सरकारनं कृषी कायदे मागे घेतले. त्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी गेल्या आठवड्यात केली. तीन कृषी कायदे मागे घेण्यामागचं नेमकं कारण आता समोर आलं आहे.

सरकारनं मानवतेच्या आधारावर कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त न्यूज१८ इंडियानं सुत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे. तीन कृषी कायद्यांना आधीच स्थगिती देण्यात आली होती. कृषी कायद्यांच्याविरोधात शेतकरी वर्षभरापासून आंदोलन करत होते. विरोधकांनी त्यांची दिशाभूल करू नये यासाठी केंद्रानं कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला, असा दावा सरकारमधील उच्चपदस्थ सुत्रांनी केला. 

हिवाळा आणि मानवतेच्या आधारे कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली. भविष्यात अशा प्रकारची परिस्थिती उद्भवू नये. शेतकऱ्यांनी त्यांच्या घरी परत जावं, या हेतूनं कृषी कायदे रद्द करण्यात आले. एमएसपी आणि अन्य अनुदानाबद्दल निर्णय घेण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यासाठी वेळ लागेल. शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारनं पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी विरोधी पक्षांच्या प्रचाराला बळी पडू नये, असं सरकारला वाटतं.

तीन कृषी कायदे रद्द करण्यात आल्यानंतरही आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार संयुक्त किसान मोर्चानं केला आहे. पुढील रणनीती निश्चित करण्यासाठी २९ नोव्हेंबरला शेतकरी संघटनांची महापंचायत आहे. एमएसपीच्या मुद्द्यावरून शेतकरी आंदोलन सुरूच राहणार आहे. संसदेच्या हिवाळ्या अधिवेशनात कायदे रद्द झाल्यानंतरच आंदोलन मागे घेऊ असं म्हणत संयुक्त किसान मोर्चाचे नेते राकेश टिकैत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मोदींनी प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख देण्याचं आश्वासनही दिलं होतं. ते कुठे पूर्ण झालं, असा सवाल करत टिकैत यांनी अप्रत्यक्षपणे सरकारबद्दल अविश्वास व्यक्त केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFarmers Protestशेतकरी आंदोलन