शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
8
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
9
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
10
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
11
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
12
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
13
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
14
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
15
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
16
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
17
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
18
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
19
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
20
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश

"गाय आमची माता, सरकारने प्राण्यांच्या यादीतून बाहेर काढावं"; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 13:43 IST

गायीला जनावरांच्या श्रेणीतून वगळण्याची मागणी स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केंद्राकडे केली आहे.

Swami Avimukteshwaranand Saraswati : महाराष्ट्र सरकारने नुकताच देशी गायींना राज्यमाता-गोमाता म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य सरकारनं महाराष्ट्रातील देशी गायींना राज्यमाता-गोमाता घोषित करण्याच्या प्रस्तावावर चर्चा केली. त्यानंतर हा प्रस्ताव मान्य करून जीआर जारी करण्यात आला. अशातच आता बद्रीनाथ ज्योतिर्मठ पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केंद्र सरकारकडे गायींसंदर्भात एक मागणी केली आहे. गायीला जनावरांच्या श्रेणीतून वगळण्याची मागणी स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केंद्राकडे केली आहे. गायीला जनावर म्हणणं चुकीचं असल्याचेही स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले.

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती हे गौ प्रतिष्ठा ध्वज स्थापन करण्यासाठी भारत भेटीदरम्यान ओडिशामध्ये पोहोचले होते. यावेळी बोलताना त्यांनी  गायीला जनावरांच्या यादीतून वगळण्याची मागणी केली. सरकारी यादीत गाय हा प्राणी आहे, पण सनातन धर्मात गायीला आईचा दर्जा आहे. त्यामुळे गायीला जनावरांच्या श्रेणीतून वगळ्यात यावं असं अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी म्हटलं. शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती हे दीर्घकाळापासून गायींच्या संवर्धनासाठी काम करत आहेत. 

"सरकारी यादीत गायीला प्राण्यांच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. तर भारतीय सभ्यता आणि संस्कृतीत गायीला देवी म्हटले गेले आहे. गायीला माता म्हणत तिचे महत्त्व सांगितले आहे. सनातन धर्म मानणारे लोक गायीला गौ माता म्हणतात. त्यामुळे गायीला प्राणी म्हणणे हा सनातन धर्माचा आणि सनातन धर्माच्या अनुयायांचा अपमान आहे. आपली परंपरा आपणच पुढे नेली पाहिजे. यासाठी सरकारने जारी केलेल्या जनावरांच्या यादीतून गाय वगळावी लागणार आहे," असं अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले.

"गोमातेचं सरंक्षण आणि संवर्धनासाठी सरकारने कायदा केल्यानंतर लोकांनाही याचं व सनातन धर्माचं गांभीर्य समजेल. त्यामुळे लोकांचा विचार करण्याची पद्धत, गायीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल. राहीला मुद्दा गायींची सेवा करण्याचा, त्यांची चांगली काळजी घेण्याचा हे आमचे काम आहे. बाकी सरकारने आधी आपले काम करावे. सरकारने गायीला जनावरांच्या यादीत ठेवले आहे. त्यामुळे लोकही गाईला जनावरासारखे वागवतात," असेही अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी म्हटलं.

टॅग्स :cowगायCentral Governmentकेंद्र सरकार