शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

सरकारला लोकांकडून दंड नको; वाहतुकीच्या शिस्तीची अपेक्षा आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 07:26 IST

गडकरी; दंडवसुलीची वेळ येता कामा नये

नवी दिल्ली : वाहनचालकांकडून प्रचंड दंड वसूल करण्याची सरकारची अजिबात इच्छा नसून, या दंडामुळे लोकांनी कायद्याचे पालन करावे आणि स्वत:चे व इतरांचे प्राण वाचवावे अशीच भूमिका आहे, असे भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी स्पष्ट केले.मोटार वाहन कायद्यातील नव्या तरतुदींमुळे वाहतुकीचे विविध नियम तोडल्यास मोठा दंड आकारणे सुरू झाले आहे. काही जणांना दुचाकी व तीनचाकी वाहनांच्या किमतीपेक्षा अधिक दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे वाढीव दंडाबद्दल टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी म्हणाले की, मुळात वाहतुकीच्या सर्व नियमांचे प्रत्येकाने पालन केले, तर दंड भरावाच लागणार नाही. दंडवसुलीची वेळ पोलिसांवर येताच कामा नये, अशा पद्धतीने वाहने चालवणे अपेक्षित आहे. सरकारला जादा दंड आकारण्याची इच्छा नाही.

वाहतुकीचे नियम मोडल्याने वा बेदरकारपणे वाहने चालविल्याने देशात सुमारे पाच लाख अपघात होतात आणि त्यात दीड लाख लोकांचा मृत्यू होतो. त्यापैकी ६० टक्के लोक १८ ते ३५ या वयोगटातील म्हणजेच तरुण असतात, असे सांगून ते म्हणाले की, या अपघातांना आळा घालण्यासाठी आणि वाहतुकीत शिस्त आणण्यासाठी मोठ्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. लोकांनी स्वत:हून शिस्तीने वाहने चालवली, तर दंड भरण्याची वेळच येणार नाही. मोटार वाहन कायद्यात दुरुस्ती करण्यापूर्वी २० राज्यांच्या परिवहनमंत्र्यांची समिती नियुक्त करण्यात आली होती. ज्यात सात अन्य राजकीय पक्षांचेही मंत्री होते.राज्यांना अधिकारच्केंद्राने मोटार वाहन कायद्यात दुरुस्ती केली असली तरी त्या लागू कराव्यात की करू नयेत आणि दंडाची रक्कम किती असावी, हे ठरविण्याचे अधिकार राज्यांना देण्यात आले आहेत. च्मध्यप्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, पंजाब या राज्यांनी या कायद्यातील काही तरतुदींविषयी आक्षेप नोंदवून तो आहे तसा लागू न करण्याचे ठरविले आहे. भाजपची सत्ता असलेल्या गुजरातनेही दंडाच्या रकमेविषयी आक्षेप घेतला आहे.च्महाराष्ट्रात हा कायदा अद्याप लागू झालेला नाही. त्यामुळे राज्यात दंडाची रक्कम नव्या कायद्यात आहे, तितकीच असेल की त्यात बदल केला जाईल, हे स्पष्ट झालेले नाही. त्याची अधिसूचना महाराष्ट्र सरकारने काढल्यावरच त्याची माहिती मिळू शकेल.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीcarकारTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस