शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

सरकारला लोकांकडून दंड नको; वाहतुकीच्या शिस्तीची अपेक्षा आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 07:26 IST

गडकरी; दंडवसुलीची वेळ येता कामा नये

नवी दिल्ली : वाहनचालकांकडून प्रचंड दंड वसूल करण्याची सरकारची अजिबात इच्छा नसून, या दंडामुळे लोकांनी कायद्याचे पालन करावे आणि स्वत:चे व इतरांचे प्राण वाचवावे अशीच भूमिका आहे, असे भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी स्पष्ट केले.मोटार वाहन कायद्यातील नव्या तरतुदींमुळे वाहतुकीचे विविध नियम तोडल्यास मोठा दंड आकारणे सुरू झाले आहे. काही जणांना दुचाकी व तीनचाकी वाहनांच्या किमतीपेक्षा अधिक दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे वाढीव दंडाबद्दल टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी म्हणाले की, मुळात वाहतुकीच्या सर्व नियमांचे प्रत्येकाने पालन केले, तर दंड भरावाच लागणार नाही. दंडवसुलीची वेळ पोलिसांवर येताच कामा नये, अशा पद्धतीने वाहने चालवणे अपेक्षित आहे. सरकारला जादा दंड आकारण्याची इच्छा नाही.

वाहतुकीचे नियम मोडल्याने वा बेदरकारपणे वाहने चालविल्याने देशात सुमारे पाच लाख अपघात होतात आणि त्यात दीड लाख लोकांचा मृत्यू होतो. त्यापैकी ६० टक्के लोक १८ ते ३५ या वयोगटातील म्हणजेच तरुण असतात, असे सांगून ते म्हणाले की, या अपघातांना आळा घालण्यासाठी आणि वाहतुकीत शिस्त आणण्यासाठी मोठ्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. लोकांनी स्वत:हून शिस्तीने वाहने चालवली, तर दंड भरण्याची वेळच येणार नाही. मोटार वाहन कायद्यात दुरुस्ती करण्यापूर्वी २० राज्यांच्या परिवहनमंत्र्यांची समिती नियुक्त करण्यात आली होती. ज्यात सात अन्य राजकीय पक्षांचेही मंत्री होते.राज्यांना अधिकारच्केंद्राने मोटार वाहन कायद्यात दुरुस्ती केली असली तरी त्या लागू कराव्यात की करू नयेत आणि दंडाची रक्कम किती असावी, हे ठरविण्याचे अधिकार राज्यांना देण्यात आले आहेत. च्मध्यप्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, पंजाब या राज्यांनी या कायद्यातील काही तरतुदींविषयी आक्षेप नोंदवून तो आहे तसा लागू न करण्याचे ठरविले आहे. भाजपची सत्ता असलेल्या गुजरातनेही दंडाच्या रकमेविषयी आक्षेप घेतला आहे.च्महाराष्ट्रात हा कायदा अद्याप लागू झालेला नाही. त्यामुळे राज्यात दंडाची रक्कम नव्या कायद्यात आहे, तितकीच असेल की त्यात बदल केला जाईल, हे स्पष्ट झालेले नाही. त्याची अधिसूचना महाराष्ट्र सरकारने काढल्यावरच त्याची माहिती मिळू शकेल.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीcarकारTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस