शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
3
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
4
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
5
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
6
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
7
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
8
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
9
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
10
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
11
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
12
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
13
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
14
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
15
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
16
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
17
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
18
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
19
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
20
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा

सरकारने शेतकरी आंदोलन संवेदनशीलतेने हाताळावे; शरद पवार यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2020 07:02 IST

शरद पवार यांचे प्रतिपादन, देशहितासाठी चांगली बाब नसल्याचे मत

नवी दिल्ली : कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाकडे केंद्र सरकारने गांभीर्याने पहायला हवे. शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार केंद्राने करायला हवा. आंदोलनाची स्थिती अशीच कायम राहिली तर देशासाठी ती चांगली बाब ठरणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केले.

शरद पवार यांचे रविवारी येथे आगमन झाले. त्यानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांच्यासह विविध पक्षाच्या नेत्यांनी पवार यांची भेट घेतली. आंदोलनावर तोडगा काढण्यास पवारांनी पुढाकार घ्यावा, अशी विनंती येचुरी यांच्यासही काही नेत्यांनी केली. मात्र, आंदोलक शेतकऱ्यांना कोणताही राजकीय पक्ष वा नेता त्यांच्या व्यासपीठावर नको आहे. त्यामुळे तिढा कधी सुटणार हा प्रश्न कायम आहे. शेतकऱ्यांशी चर्चा करणार का, या प्रश्नावर शरद पवार यांनीही स्पष्ट काही सांगितले नाही. दिल्ली भेटीत शरद पवार कोणा शेतकरी नेत्यांना वा केंद्रीय मंत्र्यांना भेटणार का, हे समजू शकलेले नाही. 

प्रजासत्ताक दिनासाठी रंगीत तालीमप्रजासत्ताक दिनासाठी रंगीत तालीमसरकार कायदे मागे घेणार नसेल, तर जागचे हलणार नाही, हे शेतकऱ्यांकडून दररोज सांगितले जात आहे. त्याशिवाय सरकारचा निषेध म्हणून प्रजासत्ताक दिनी राजपथवर ताबा मिळविण्यासाठी शेतकऱ्यांच्या हालचाली सुरू आहेत. चिल्ला सीमेवर शेतकऱ्यांनी त्याची रंगीत तालीमही सुरू केली आहे.

ही परिस्थिती अजिबातच भूषणावह आणि देशहिताची नाही- पवार

केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे आंदोलन लवकर संपावे यासाठी प्रयत्न करायला हवे. त्यांच्या मागण्यांबाबत तोडगा काढण्यासाठी गांभीर्याने विचार करायला हवा. आतापर्यंत चार-पाच आंदोलकांनी आत्महत्या केल्या आहेत. ही परिस्थिती अजिबातच भूषणावह आणि देशहिताची नाही.

यूपीएच्या अध्यक्षपदात रस नाही

यूपीएच्या अध्यक्षपदात आपल्याला अजिबात रस नाही, असे पवार यांनी पुन्हा एकवार स्पष्ट केले. ‘मला त्यात रस नाही. त्यासाठी वेळही नाही’, असे सांगून पवार म्हणाले की, ‘मला न विचारताच ही चर्चा सुरू करण्यात आली आहे’. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विधानांमुळे ही चर्चा सुरू झाली होती. 

उद्या चर्चेची सातवी फेरीकेंद्राने केलेले तीनही कृषी कायदे तातडीने मागे घ्यावेत, या मागणीसाठी गेल्या ३३ दिवसांपासून आंदोलन करत असलेल्या शेतकरी संघटना आणि केंद्र सरकार यांच्यात बुधवारी, ३० डिसेंबर रोजी चर्चेची सातवी फेरी पार पडणार आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारFarmer strikeशेतकरी संपBJPभाजपा