शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने जनतेच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात - मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 04:49 IST

रा.स्व. संघाच्या तृतीय वर्ष प्रशिक्षण वर्गाचा समारोप

नागपूर : देशातील जनतेने भाजप सरकारवर पुन्हा एकदा विश्वास दर्शविला आहे. २०१४ च्या तुलनेत अधिक जागा निवडून दिल्या आहेत. याचाच अर्थ जनतेच्या काही अपेक्षा या सरकारने पूर्ण केल्या होत्या तर काही अपूर्ण आहेत. अपूर्ण अपेक्षा पूर्ण करण्यासाठीच जनतेने पुन्हा संधी दिली आहे. तेव्हा सरकारने जबाबदारीने त्या पूर्ण केल्याच पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे केले.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष प्रशिक्षण शिबिराचा समारोप रविवारी नागपुरातील रेशीमबाग मैदानात पार पडला. स्वयंसेवकांना त्यांनी मार्गदर्शन केले. समारोपीय कार्यक्रमाला पू. चित्तरंजन जी महाराज (आगरतळा), कृष. गोपालकृष्ण जी (बंगळुरु). यशराज व युवराज (दिल्ली), डॉ. कृष्णास्वामी (कोईम्बतुर), पाचीपाला दोरा स्वामी, रमेश (जालंधर) आणि श्री हासन वासजी ढेम्पो (गोवा) हे प्रमुख अतिथी होते.नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत हे पहिल्यांदाच स्वयंसेवकांना मार्गदर्शन करीत होते. त्यामुळे ते काय बोलतात, याबाबत लोकांमध्ये उत्सुकता होती. त्यांनी, सरकारने कुठल्या अपेक्षा पूर्ण कराव्यात हे स्पष्टपणे सांगितले नाही. परंतु ते म्हणाले, देशातील मतदार हे पहिल्या निवडणुकीपासून काही ना काही शिकत आले आहेत. मतदार आता अधिक जागरुक झाले आहेत.देशाची अखंडता, एकता, विकास आणि पारदर्शकतेला ते मतदान करू लागले आहेत. तेव्हा निवडणुकीत त्यांना आता फसवता येऊ शकत नाही. ही बाब सर्वच राजकीय पक्षांनी समजून घेण्याची गरज आहे, असा इशाराही त्यांनी दिला. २५ दिवसीय शिबिरात देशभरातील ८२८ स्वयंसेवक सहभागी झाले.पश्चिम बंगालची परिस्थिती देशासाठी घातकनिवडणुकीमध्ये स्पर्धा असते. निवडून येण्यासाठी बरेच काही बोलले जाते. परंतु निवडणूक संपली की स्पर्धा संपते. संसदेत निवडून येणाºया सर्वपक्षीय लोकांनी देशासाठी मिळून काम करायचे असते. जिंकणाºयाने गुर्मीत राहिले आणि हरणाºयाने संतापात राहिले तर देशाचे काय होईल. पश्चिम बंगालमध्ये सध्या तेच सुरू आहे. खुर्चीचा मोहभंग किती हादरवून सोडतो. बंगालमध्ये राहायचे असेल तर बंगाली भाषा यायला हवी, अशी भाषा योग्य नाही. देशासाठी हे घातक आहे, असे ते म्हणाले.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही दिला होता इशाराडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत सांगितले होते की, आपल्या देशाला कुणी ताकदीच्या जोरावर जिंकले नाही, तर आपण आपसात लढल्यामुळेच त्यांना आपल्याला जिंकता आले, हा इतिहास आहे, याची आठवणही त्यांनी करुन दिली.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ