शहरं
Join us  
Trending Stories
1
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
4
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
5
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
6
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
7
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
8
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
9
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
10
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
11
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
12
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
13
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
14
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
15
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
16
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
17
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
18
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
19
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

सरकारने जनतेच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात - मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 04:49 IST

रा.स्व. संघाच्या तृतीय वर्ष प्रशिक्षण वर्गाचा समारोप

नागपूर : देशातील जनतेने भाजप सरकारवर पुन्हा एकदा विश्वास दर्शविला आहे. २०१४ च्या तुलनेत अधिक जागा निवडून दिल्या आहेत. याचाच अर्थ जनतेच्या काही अपेक्षा या सरकारने पूर्ण केल्या होत्या तर काही अपूर्ण आहेत. अपूर्ण अपेक्षा पूर्ण करण्यासाठीच जनतेने पुन्हा संधी दिली आहे. तेव्हा सरकारने जबाबदारीने त्या पूर्ण केल्याच पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे केले.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष प्रशिक्षण शिबिराचा समारोप रविवारी नागपुरातील रेशीमबाग मैदानात पार पडला. स्वयंसेवकांना त्यांनी मार्गदर्शन केले. समारोपीय कार्यक्रमाला पू. चित्तरंजन जी महाराज (आगरतळा), कृष. गोपालकृष्ण जी (बंगळुरु). यशराज व युवराज (दिल्ली), डॉ. कृष्णास्वामी (कोईम्बतुर), पाचीपाला दोरा स्वामी, रमेश (जालंधर) आणि श्री हासन वासजी ढेम्पो (गोवा) हे प्रमुख अतिथी होते.नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत हे पहिल्यांदाच स्वयंसेवकांना मार्गदर्शन करीत होते. त्यामुळे ते काय बोलतात, याबाबत लोकांमध्ये उत्सुकता होती. त्यांनी, सरकारने कुठल्या अपेक्षा पूर्ण कराव्यात हे स्पष्टपणे सांगितले नाही. परंतु ते म्हणाले, देशातील मतदार हे पहिल्या निवडणुकीपासून काही ना काही शिकत आले आहेत. मतदार आता अधिक जागरुक झाले आहेत.देशाची अखंडता, एकता, विकास आणि पारदर्शकतेला ते मतदान करू लागले आहेत. तेव्हा निवडणुकीत त्यांना आता फसवता येऊ शकत नाही. ही बाब सर्वच राजकीय पक्षांनी समजून घेण्याची गरज आहे, असा इशाराही त्यांनी दिला. २५ दिवसीय शिबिरात देशभरातील ८२८ स्वयंसेवक सहभागी झाले.पश्चिम बंगालची परिस्थिती देशासाठी घातकनिवडणुकीमध्ये स्पर्धा असते. निवडून येण्यासाठी बरेच काही बोलले जाते. परंतु निवडणूक संपली की स्पर्धा संपते. संसदेत निवडून येणाºया सर्वपक्षीय लोकांनी देशासाठी मिळून काम करायचे असते. जिंकणाºयाने गुर्मीत राहिले आणि हरणाºयाने संतापात राहिले तर देशाचे काय होईल. पश्चिम बंगालमध्ये सध्या तेच सुरू आहे. खुर्चीचा मोहभंग किती हादरवून सोडतो. बंगालमध्ये राहायचे असेल तर बंगाली भाषा यायला हवी, अशी भाषा योग्य नाही. देशासाठी हे घातक आहे, असे ते म्हणाले.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही दिला होता इशाराडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत सांगितले होते की, आपल्या देशाला कुणी ताकदीच्या जोरावर जिंकले नाही, तर आपण आपसात लढल्यामुळेच त्यांना आपल्याला जिंकता आले, हा इतिहास आहे, याची आठवणही त्यांनी करुन दिली.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ