शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
2
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
3
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
4
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
5
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
6
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
7
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
8
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
9
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
10
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
11
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
12
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
13
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम
14
₹३१,००० कोटींच्या कंपनीचे मालक संजय कपूर यांचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, कोणता होता त्यांचा व्यवसाय?
15
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
16
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
17
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
18
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
19
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
20
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video

अर्थव्यवस्थेला 'व्हायग्रा'ची आवश्यकता, काँग्रेसच्या कपिल सिब्बल यांचं विचित्र विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2017 14:49 IST

जीडीपीमधील वाढीसंदर्भात केंद्र सरकारनं केलेल्या दाव्यांवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी कोपरखळी घेत एक विचित्र विधान केले आहे.  

नवी दिल्ली, दि. 23 - जीडीपीमधील वाढीसंदर्भात केंद्र सरकारनं केलेल्या दाव्यांवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी कोपरखळी घेत एक विचित्र विधान केले आहे.  सरकारचा वाढीचा अर्थ  म्हणजे गॅस सिलिंडर, पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ असा होता. यानंतर सिब्बल यांनी म्हटले की, मात्र सरकारला आता जाणवले आहे की अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी व्हायग्राची आवश्यकता आहे.

कपिल सिब्बल यांनी यावेळी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत म्हटले की, ''ते म्हणायची की देशाच्या जीडीपीमध्ये वाढ होईल. या वाढीचा खरा अर्थ म्हणजे सिलिंडर गॅस, डिझेल, पेट्रोलच्या किंमतींमध्ये वाढ होणे असा आहे. एक लिटर कच्च्या तेलाची किंमत जवळपास 21 रुपये आहे आणि रिफाइन केल्यानंतर त्याची किंमत जवळपास 31 रुपये एवढी होते. सरकारला प्रत्येक लिटर मागे 48 रुपयांचा नफा होत आहे''. 

सिब्बल पुढे असेही म्हणाले की, सामान्य नागरिक व शेतक-याला महागाईचे हे ओझे उचलावं लागत आहे.  नफा सरकारला मिळतो आणि महागाईचं ओझं सामान्य नागरिक व शेतक-याच्या डोक्यावर येते.  सर्वसामान्य नागरिकाच्या डोक्यावरील हे ओझं कमी करण्याऐवजी ते वाढत जात आहे. यावर भाजपाचे मंत्री म्हणतात की, पेट्रोल, डिझेल खरेदी करणारे काही गरीब लोकं नाहीत किंवा ते भुकेने मरतही नाहीत'. असे सांगत सिब्बल यांनी केंद्रीय पर्यटनमंत्री के. जे. अल्फोन्स यांच्यावर टीका केली.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी केंद्रीय पर्यटन मंत्री के. जे. अल्फोन्स यांनी पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले होते. ''पेट्रोल, डिझेल खरेदी करणारे काही गरीब लोकं नाहीत किंवा ते भुकेने मरतही नाही आहेत. पेट्रोलची खरेदी करणारे कार आणि बाईकचे मालक आहेत. त्यांना पेट्रोल आणि डिझेलवर अतिरिक्त कर भरावाच लागेल. केंद्र सरकारला गरिबांचं भलं करायचं आहे त्यामुळे श्रीमंतावर जास्त टॅक्स लावत आहे'',  असं अल्फोन्स म्हणाले होते. 

यावर सिब्बल म्हणालेत, ''गरीब आणखी गरीब होत जात आहे आणि श्रीमंत अधिक श्रीमंत होत जात आहे. आता या सरकारला जाणवलं आहे की अर्थव्यवस्थासंदर्भात काही करण्यासाठी त्यांना व्हायग्रासारख्या गोष्टीची गरज आहे.  साडेतीन वर्षांनंतर जर अर्थव्यवस्थेची अशी स्थिती राहिली तर, देशाचं काय होईल?. अर्थव्यवस्था वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना व्हायग्राची आवश्यकता आहे, याची त्यांना जाणीव झाली, हे  बरं झालं'', अशी खरमरीत पण तितकीच विचित्र शब्दांत सिब्बल यांनी भाजपा सरकारवर टीका केली आहे.