शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अर्थव्यवस्थेला 'व्हायग्रा'ची आवश्यकता, काँग्रेसच्या कपिल सिब्बल यांचं विचित्र विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2017 14:49 IST

जीडीपीमधील वाढीसंदर्भात केंद्र सरकारनं केलेल्या दाव्यांवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी कोपरखळी घेत एक विचित्र विधान केले आहे.  

नवी दिल्ली, दि. 23 - जीडीपीमधील वाढीसंदर्भात केंद्र सरकारनं केलेल्या दाव्यांवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी कोपरखळी घेत एक विचित्र विधान केले आहे.  सरकारचा वाढीचा अर्थ  म्हणजे गॅस सिलिंडर, पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ असा होता. यानंतर सिब्बल यांनी म्हटले की, मात्र सरकारला आता जाणवले आहे की अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी व्हायग्राची आवश्यकता आहे.

कपिल सिब्बल यांनी यावेळी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत म्हटले की, ''ते म्हणायची की देशाच्या जीडीपीमध्ये वाढ होईल. या वाढीचा खरा अर्थ म्हणजे सिलिंडर गॅस, डिझेल, पेट्रोलच्या किंमतींमध्ये वाढ होणे असा आहे. एक लिटर कच्च्या तेलाची किंमत जवळपास 21 रुपये आहे आणि रिफाइन केल्यानंतर त्याची किंमत जवळपास 31 रुपये एवढी होते. सरकारला प्रत्येक लिटर मागे 48 रुपयांचा नफा होत आहे''. 

सिब्बल पुढे असेही म्हणाले की, सामान्य नागरिक व शेतक-याला महागाईचे हे ओझे उचलावं लागत आहे.  नफा सरकारला मिळतो आणि महागाईचं ओझं सामान्य नागरिक व शेतक-याच्या डोक्यावर येते.  सर्वसामान्य नागरिकाच्या डोक्यावरील हे ओझं कमी करण्याऐवजी ते वाढत जात आहे. यावर भाजपाचे मंत्री म्हणतात की, पेट्रोल, डिझेल खरेदी करणारे काही गरीब लोकं नाहीत किंवा ते भुकेने मरतही नाहीत'. असे सांगत सिब्बल यांनी केंद्रीय पर्यटनमंत्री के. जे. अल्फोन्स यांच्यावर टीका केली.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी केंद्रीय पर्यटन मंत्री के. जे. अल्फोन्स यांनी पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले होते. ''पेट्रोल, डिझेल खरेदी करणारे काही गरीब लोकं नाहीत किंवा ते भुकेने मरतही नाही आहेत. पेट्रोलची खरेदी करणारे कार आणि बाईकचे मालक आहेत. त्यांना पेट्रोल आणि डिझेलवर अतिरिक्त कर भरावाच लागेल. केंद्र सरकारला गरिबांचं भलं करायचं आहे त्यामुळे श्रीमंतावर जास्त टॅक्स लावत आहे'',  असं अल्फोन्स म्हणाले होते. 

यावर सिब्बल म्हणालेत, ''गरीब आणखी गरीब होत जात आहे आणि श्रीमंत अधिक श्रीमंत होत जात आहे. आता या सरकारला जाणवलं आहे की अर्थव्यवस्थासंदर्भात काही करण्यासाठी त्यांना व्हायग्रासारख्या गोष्टीची गरज आहे.  साडेतीन वर्षांनंतर जर अर्थव्यवस्थेची अशी स्थिती राहिली तर, देशाचं काय होईल?. अर्थव्यवस्था वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना व्हायग्राची आवश्यकता आहे, याची त्यांना जाणीव झाली, हे  बरं झालं'', अशी खरमरीत पण तितकीच विचित्र शब्दांत सिब्बल यांनी भाजपा सरकारवर टीका केली आहे.