शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

सरकार भरणार ३ वर्षे २ लाखांचा विमा हप्ता

By admin | Updated: January 21, 2017 05:19 IST

भारतातल्या २७ कोटी ‘जन धन’ बँक खातेदारांसाठी एक शुभवर्तमान आहे.

सुरेश भटेवरा,

नवी दिल्ली- भारतातल्या २७ कोटी ‘जन धन’ बँक खातेदारांसाठी एक शुभवर्तमान आहे. देशातल्या गरीब वर्गाची सामाजिक सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी जनधन खातेधारकांना पुढल्या ३ वर्षांपर्यंत २ लाखांचा विमा विनामूल्य देण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर बहुधा अर्थसंकल्पात ही घोषणा अर्थमंत्री करतील, अशी शक्यता आहे.देशात २७ कोटी जनधन खाती उघडण्यात आली आहेत. त्यापैकी १६ कोटी खाती आधार कार्डाशी संलग्न आहेत. नव्या विमा योजनेनुसार अपघात व जीवन अशा दोन्ही प्रकारच्या विम्याचा लाभ विनामूल्य देण्याचे सरकारने ठरवले तर किमान ९ हजार कोटींचा भार सरकारी तिजोरीवर पडणार आहे. अशा कोणत्या योजनेचा गरिबांना अधिकाधिक लाभ देता येऊ शकेल, याचा विचार सरकारी स्तरावर गांभीर्याने सुरू आहे. या योजनेत विमाधारकाच्या ३ वर्षांच्या विमा प्रीमियमची पूर्ण रक्कम सरकार भरणार आहे.केंद्र सरकारने २0१४ साली पंतप्रधान सुरक्षा विमा योजना(पीएमएसबीवाय) वार्षिक हप्ता १२ रुपये, पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (पीएमजेजेबीवाय) वार्षिक हप्ता ३३0 रुपये व अटल पेन्शन योजना (एपीवाय) अशा सामाजिक सुरक्षेच्या तीन योजना सुरू केल्या. >निर्णय विचाराधीनअर्थ मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, ३.0६ कोटी लोक पीएमजेजेबीवाय योजनेशी व ९.७२ कोटी लोक पीएमएसबीवाय योजनेशी जोडले गेले आहेत. त्यात अपघात व अपंगत्व अशा दोन्ही प्रकारांत विम्याचा लाभ समाविष्ट आहे. विमाधारकाला २ लाख रुपयांचा विमा दोन्ही प्रकारात मिळतो. तरीही भारतात जीडीपी व विम्याचे हप्ते यांचे प्रमाण खूपच कमी आहे. २0१५ साली ते अवघे ३.४४ टक्के होते. सामाजिक सुरक्षेसाठी हे प्रमाण वाढले पाहिजे, या हेतूने नवा निर्णय सरकारच्या विचाराधीन आहे, अशी माहिती आहे.