शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

आता UPSC परीक्षा पास न करता बनता येणार ऑफिसर, मोदी सरकारचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2018 17:04 IST

मोदी सरकारनं नोकरशाहांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता तुम्हाला  UPSC परीक्षा उत्तीर्ण न करताही अधिकारी बनता येणार आहे.

नवी दिल्ली- मोदी सरकारनं नोकरदारांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता तुम्हाला  UPSC परीक्षा उत्तीर्ण न करताही अधिकारी बनता येणार आहे. आता वरिष्ठ अधिकारी बनवण्यासाठी यूपीएससीची सिव्हिल परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं नाही. तसेच खासगी कंपनीत काम करणा-या नोकरदारांनाही मोदी सरकारच्या या निर्णयाचा फायदा होणार आहे. या निर्णयाबाबतची अधिसूचना मोदी सरकारनं जारी केली आहे.कार्मिक व प्रशिक्षण विभागासाठी या पदांवर नियुक्त करण्याच्या अधिका-यांसाठी विस्तार स्वरूपात मार्गदर्शिकेसह अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे सरकारला आता सेवा नियमातही बदल करावा लागणार आहे. राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी मोदी सरकारच्या या निर्णयाची माहिती दिली आहे. ते म्हणाले, सद्यस्थितीत या निर्णयामुळे कर्तृत्ववानांना योग्य संधी मिळणार आहे. भारतीय नागरिकांना स्वतःची प्रतिभा आणि क्षमता दाखवता यावी, यासाठी असा निर्णय घेण्यात आला आहे.तसेच या अधिका-यांना तीन वर्षं संधी देण्यात येणार आहे. डीओपीटीनं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार मंत्रालयातील जॉइंट सेक्रेटरीच्या पदावर नियुक्ती होणार आहे. तसेच नवनियुक्त अधिका-यांना 3 वर्षं काम करण्याची संधी मिळणार असून, त्यांची कामगिरी पाहून त्यांचा कार्यकाळ 5 वर्षांपर्यंत वाढवता येणार आहे. या पदांसाठीच्या अर्जांना वयाची अट शिथिल करण्यात आली असून, तुम्ही 40 वर्षांपर्यंत या पदांसाठी अर्ज करू शकता. तसेच या अधिका-यांचं वेतनही सहसचिवाएवढं असून, त्यांना इतर वरिष्ठ अधिका-यांसारख्याच सुविधा मिळणार आहेत. या अधिका-यांची मुलाखत मंत्रिमंडळ सचिवाच्या नेतृत्वाखाली कमिटी घेणार आहे. पदवीधर, सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्ती,  खासगी कंपनीतील व्यक्तीही यासाठी अर्ज करू शकतो. फक्त त्याला त्याच्या क्षेत्रातील 15 वर्षांचा अनुभव हवा. तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जुलै आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी